शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही ‘अधिकृत आमदार’ केव्हा होणार?; निर्वाचित लोकप्रतिनिधींची विचित्र कोंडी

By अतुल कुलकर्णी | Published: November 17, 2019 3:15 AM

विधानसभा गठित होण्याची प्रतीक्षा; तब्बल ११० लोकप्रतिनिधी पहिल्यांदा आले आहेत निवडून

- अतुल कुलकर्णी मुंबई : आम्हाला लोक आमदार तरी म्हणतील का? आम्ही आमदारकीची शपथ कधी घेऊ शकतो? विधानसभेत आम्हाला कधी जाता येईल? असे अनेक प्रश्न सध्या निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांना विचारत आहेत. सगळ्या पक्षांचे मिळून तब्बल ११० लोकप्रतिनिधी पहिल्यांदा निवडून आले आहेत. मात्र त्यापैकी अनेकांनी विधानसभेचे सभागृह फक्त बाहेरुनच पाहिले आहे.आपण कधी ‘आमदार’ होणार असा प्रश्न या लोकप्रतिनिधींना पडलेला असताना दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारण करण्यासाठी आधी विधानसभा गठित व्हावी लागेल, ती झाल्याशिवाय कोणत्याच पक्षाला काहीही करता येणार नाही. कोणत्या तरी पक्षाने आपल्याकडे बहुमत आहे हे सांगून सरकार स्थापन करण्याचा दावा करावा लागेल. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगावे लागेल.हे बहुमत फक्त विधानसभेच्या सभागृहात सिद्ध करता येते. त्यासाठी आधी विधानसभा गठित करावी लागेल. त्यानंतर राज्यपाल हंगामी विधानसभा अध्यक्ष नेमतील. ते हंगामी अध्यक्ष नवनियुक्त सदस्यांना सभागृहात शपथ घेतील. शपथ घेतल्यानंतरच ते विधानसभेचे सदस्य होतील आणि विधानसभेचे सभागृह अस्तित्वात येईल. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाईल. ती निवड झाल्यानंतर विधानसभेच्या कामकाजास सुरुवात होईल आणि त्यावेळी ज्यांनी कोणी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला असेल त्यांना सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.अध्यक्षाची निवड जर बिनविरोध झाली तर मुख्यमंत्र्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठीची प्रक्रिया हा औपचारिक भाग ठरतो. मात्र सत्ताधारी पक्षाने अध्यक्षपदासाठी उभा केलेला उमेदवार पराभूत झाला तर सरकारकडे बहुमत नसल्याचे दिसून येईल. अन्यथा राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी पाचारण केलेल्या नेत्यास आपले बहुमत स्वतंत्रपणे पुन्हा सिद्ध करावे लागेल.एकदा अध्यक्ष निवडला गेला की ज्या कोणत्या पक्षाला दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायचे असतील, किंवा ज्या पक्षातल्या आमदारांना वेगळा गट करायचा असेल तर त्यांना त्यांच्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतियांश सदस्यांची गरज भासेल. तेवढे सदस्य असतील तर त्यांना नव नियुक्त अध्यक्षांकडे आम्हाला वेगळा गट करायचा आहे, अशी मागणी करावी लागेल. अध्यक्षांनी त्यांना तशी परवानगी दिली तरच ती फूट अधिकृत धरली जाते. त्यानंतर तो गट त्यांच्या पैकी एकाची गटनेता म्हणून निवड करु शकतो आणि तो गट अन्य कोणत्या पक्षात ही विलीन केला जाऊ शकतो किंवा स्वत:चे वेगळे अस्तित्व ठेवूनही काम करु शकतो.प्रतोदांचा आदेश असेल तर...?व्हीप म्हणजे प्रतोद. प्रतोदाची निवड पक्ष करतो. एखाद्या विषयावर विधानसभेत किंवा विधानपरिषदेत मतदान घेतले जाणार असेल तर ते मतदान कोणत्या बाजूने करायचे याचा आदेश प्रतोदांच्या स्वाक्षरीने काढला जातो. तो आदेश आमदारांनी पाळला नाही तर त्या सदस्यांच्या विरोधात अध्यक्ष किंवा सभापतींकडे प्रतोदांना तक्रार करता येते. ही तक्रार अर्धन्यायिक स्वरुपाची असते. त्यावर अध्यक्ष/सभापती निर्णय देतात. आदेशाच्या विरुद्ध मतदान करणाऱ्यांचे सदस्यत्व यात रद्द होऊ शकते. त्यामुळे असे आमदारांना पुन्हा निवडून येईपर्यंत किंवा संबंधीत विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत कोणतेही लाभाचे पद किंवा मंत्रीपदही स्वीकारु शकत नाहीत.कोणाचे दोन तृतीयांश, किती होतील?पक्ष          एकूण सदस्य  दोन तृतीयांश    भाजप           १०५                ७०शिवसेना        ५६                 ३७राष्ट्रवादी         ५४                 ३६काँग्रेस           ४४                  २९

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस