शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:19 PM

'शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही.'

ठळक मुद्देशिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असंही आठवले यांनी नमूद केलं आहे.

भाजपाने सरकार स्थापन करण्यास नकार दिला असला आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा महाशिवआघाडी अस्तित्वात येण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अजूनही प्रचंड आशावादी आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, असं आवाहन करत त्यांनी दोन्ही भावांना मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला सुचवला आहे.   

शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही. त्यांच्यासोबत जाऊन अल्पकाळ टिकणारं सरकार स्थापन करण्यापेक्षा सेनेनं भाजपासोबतच राहावं. साडेतीन वर्षं भाजपाचा मुख्यमंत्री आणि दीड वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री, असं वाटप करून दोघांनी आपापसातील वाट मिटवावा, असं रामदास आठवलेंचं म्हणणं आहे. शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेत ते महायुतीमुळे आलेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढून निवडून आलेत. असं असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात करू नये, अशी आग्रही सूचना त्यांनी केलीय.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये महत्वपूर्ण भेट; शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार?

भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? अजित पवारांना केला फोन 

शिवसेनेनं काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये, हे सांगतानाच, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असंही आठवले यांनी नमूद केलं आहे. सेनेसोबत गेल्यास, धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून असलेला काँग्रेसचा जनाधार धोक्यात येऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. अर्थात, आठवलेंचा हेतू चांगला असला, तरी आजची राजकीय स्थिती पाहता तो प्रत्यक्षात येणं कठीणच दिसतंय.

शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

भाजपाच्या मित्रपक्षांची अवस्था म्हणजे 'इकडं आड तिकडं विहीर'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आग्रही भूमिका घेतल्याने भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यानंतर, राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवर, आज सकाळपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी आणि बैठका सुरू आहेत. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं शिवसेना रालोआमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा