शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : भाजपा सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 16:30 IST

Maharashtra Election 2019 : महाराष्ट्र उद्योगात एक नंबरचं राज्य करण्यासाठी आम्ही कष्ट केले. कारखानदारी उभी केली, हजारो हातांना काम देण्याची काळजी घेतली.

शिवरायांचा आदर्श ठेवून राज्य चालवण्याचा निर्णय यांनी घेतला. मात्र महाराजांचा इतिहास ज्याठिकाणी तयार झाला ते गडकिल्ले इथून पुढे पर्यटन केंद्र म्हणून जाहीर केले. तिथे हॉटेल, बार काढायला परवानगी देणार आणि तिथे छमछमची व्यवस्था करणार का? तसेच ज्या महाराजांची तलवार शौर्याने तेजाने चमकली त्याठिकाणी दारूचे अड्डे काढण्याचा निकाल या सरकारने घेतल्याने यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्र उद्योगात एक नंबरचं राज्य करण्यासाठी आम्ही कष्ट केले. कारखानदारी उभी केली, हजारो हातांना काम देण्याची काळजी घेतली. त्याचप्रमाणे धरणं बांधण्यासाठी पुढाकार घेत अनेक प्रागतिक निर्णय आम्ही घेतले. रोजगार हमी कायदा १९७८ साली एकमताने झाला तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री मी होतो. देशात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा पहिला निर्णय महाराष्ट्रात झाला तेव्हाही मीच मुख्यमंत्री असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. अकोल्यातील प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.

राज्यात मंडल कमिशनच्या निर्णयावरून दंगली झाल्या. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय राबवला. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी काहींचा विरोध असतानाही आम्ही विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिलं होतं. तुम्ही काय केलं? अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचं जाहीर केलं पण आजवर एका विटेचंही बांधकाम केलं नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करण्याचं जाहीर केलं. पण घटनेच्या शिल्पकाराचं स्मारक तुम्हाला ५ वर्षांत उभारता आलं नाही आणि मला विचारतात तुम्ही काय केलं? असा प्रश्न देखील शरद पवारांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akole-acअकोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेस