शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Maharashtra Election 2019: बंडोबांना शांत करण्यात महायुतीला यश?; पाहा कुठे अन् कोणी घेतली माघार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 17:13 IST

पनवेल विधानसभा मतदार संघात सेनेची बंडखोरी शमविण्यात यश आलं असून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बबन पाटील यांची माघार घेत युतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंडोबांना शांत करण्यात शिवसेना-भाजपा महायुतीला काही प्रमाणात यश आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. अनेक बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी कमी झाल्याचं दिसून येत आहे. तसेच यातही काही भागात राष्ट्रवादी-मनसे यांनी पडद्यामागून एकमेकांना सहकार्य केल्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये राष्ट्रवादी उमेदवारासाठी मनसे उमेदवाराने माघार घेतली तर त्याची परतफेड म्हणून ठाण्यात मनसे उमेदवाराला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी उमेदवाराने माघार घेतली आहे. 

शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून माघार घेतली आहे. भाजच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता. याठिकाणी शिवसेनेच्या तिघांपैकी 2 जणांची माघार आहे तर शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे नॉट रीचेबल असल्याने त्यांची बंडखोरी कायम असल्याचं दिसून आलं. ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी निवडणूक न लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार, पक्षाने सुहास देसाई यांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. सुहास देसाई यांनीही पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षादेशाचा सन्मान करीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, असे परांजपे आणि मुल्ला यांनी सांगितले. औरंगाबाद मध्यमधून भाजपचे बंडखोर किशनचंद तनवाणी आणि एमआयएम बंडखोर जावेद कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची बंडखोरी कायम आहे तर राष्ट्रवादी उमेदवार रवींद्र पाटील यांनी माघार घेत शिवसेना उमेदवाराला समर्थन देण्याची खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील चारही मतदार संघातून भाजप बंडखोरांची माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेना-आघाडीची थेट लढत होणार आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रणजीत भोसले यांची माघार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि भाजपमधून शिवसेनेत गेलेले महेश शिंदे यांच्यात होणार लढत होईल. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे बंडखोर सुधीर कोठारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी आमदार अशोक शिंदे यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

पनवेल विधानसभा मतदार संघात सेनेची बंडखोरी शमविण्यात यश आलं असून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बबन पाटील यांची माघार घेत युतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साताऱ्यात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतून तसेच वाई विधानसभा निवडणूकीतून माघार घेऊन उदयनराजे व मदन भोसलेंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेना बंडखोराची उमेदवारी कायम आहे, धनंजय बोडारे यांनी माघार न घेतल्याने त्यांची आता भाजपचे उमेदवार आ. गणपत गायकवाड यांच्या विरोधात लढत राहणार आहे. बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची बंडखोरी कायम ठेवली असून  शिवसैनिकांच्या आग्रहाखातर निवडणूक लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्या विरुद्ध काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील  उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य अँड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली. तर भाजपाचे सरचिटनीस  डॉ. अतुल भोसले यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कराड दक्षिणमध्ये काँग्रेस, भाजपा आणि उंडाळकर गटात चुरशीची तिरंगी लढत होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019