शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Election 2019: शेतकऱ्यांचे अन् उद्योजकांचे नुकसान करणाऱ्या भाजपाला दारातही उभं करु नका: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 6:58 PM

Maharashtra Election 2019: भाजपा सरकारच्या काळात फसवी कर्जमाफीमुळे राज्यात 16 हजार शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारकडे कोणतेही आस्थान नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

भाजपा सरकारच्या काळात फसवी कर्जमाफीमुळे राज्यात 16 हजार शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारकडे कोणतेही आस्थान नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. अहमदनगरमध्ये शरद पवारांची पहिल्या जाहीर प्रचार सभेत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

शरद पवार म्हणाले की, सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले आहे. तसेत सरकारच्या अनेक धोरणामुळे राज्यातील कारखाने बंद पडल्याने लोकांना आपले रोजगार गमवण्याची वेळ आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा लोकांना मतदानासाठी दारतही उभे करु नका असं आवाहन शरद पवारांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली असताना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही सत्तेत असताना आम्ही एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होतो, पण आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढून सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, अशा सरकारला चांगला धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे आमचे सरकार सत्तेवर आल्यावर शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. 

विजयादशमीनिमित्त पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते आज (मंगळवारी) झाला. यावेळी पवार पुढे म्हणाले, या निवडणुकीत उमेदवाराला लोक आर्थिक मदत करतात हे मी पहिल्यांदाच पाहिले आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी पारनेरला मी एमआयडीसी सुरू केली. पारनेरमध्ये मी लंके यांच्या रुपाने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिला आहे. त्यांना संधी द्या. पाणी प्रश्नांसह विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या माध्यमातून यापुढील काळात प्रयत्न केले जातील असं आश्वासन देखील शरद पवारांनी नागरिकांना केलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसparner-acपारनेरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा