शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
3
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
4
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
5
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
6
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
7
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
8
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
9
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
10
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
11
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
12
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
13
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
14
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
15
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
16
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
17
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
18
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
19
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
20
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 08:13 IST

लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि खासदार ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र लढत होते. या दोघांच्या आघाडीला भाजपाची बी टीमही असे म्हटले गेले होते. maharashtra election results 2019

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र लढत होते. या दोन्ही पक्षांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. जवळपास 11 जागा वंचितमुळे गमवाव्या लागल्या होत्या. मात्र, विधानसभेलाही या दोन पक्षांचा फटका आघाडीला बसला आहे. या जागा एवढ्या आहेत की, भाजपा-शिवसेना युतीला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण बनणार होते. 

लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि खासदार ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र लढत होते. या दोघांच्या आघाडीला भाजपाची बी टीमही असे म्हटले गेले होते. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीची दलित, वंचित समाज आणि मुस्लिम अशी परंपरागत मते या पक्षांना जाणार होती. लोकसभेला याचा फटका बसला. विधानसभेला मात्र वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी तुटली. लोकसभेला या आघाडीचा एकमेव खासदार निवडून आला होता. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या जवळपास 11 जागा पडण्याएवढी मते या आघाडीने मिळविली होती. 

विधानसभेला आंबेडकर यांनी 288 पैकी 280 जागा मागितल्या आणि एमआयएमला 8 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने एमआयएमच्या खासदाराने आघाडी तुटल्याची घोषणा केली होती. यावर आंबेडकर यांनी ओवेसी यांचा निर्णय अंतिम असल्याचे म्हटले होते. मात्र, ओवेसींनीही यावर शिक्कामोर्तब केले होते. हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर विधानसभेला चित्र वेगळे दिसले असते. काल लागलेल्या निकालांमध्ये एमआयएमने 2 जागा जिंकल्या आहेत. या जागांवर एमआयएमचाच आमदार होता. तर वंचितला भोपळाही फोडता आलेला नाही. 

असे असले तरीही या दोन्ही पक्षांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. भाजपाला कालच्या निकालामध्ये 105 जागा, शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 44 आणि राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत. मनसेचा एकमेव उमेदवार जिंकला आहे. यानुसार युतीचे 161 आणि 98 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता होती. वंचित आणि एमआयएमने काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाडलेल्या जागा पाहता युतीला बहुमत गाठणे कठीण गेले असते. युती बहुमतापासून 16 जागांनी पुढे आहे. 

या दोन पक्षांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तब्बल 23 जागा गमवाव्या लागल्या आहेत. या जागांवर जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विजय झाला असता तर त्यांच्या 121 जागा झाल्या असत्या आणि युतीच्या 138 जागा. असे झाले असते तर सत्तेची समीकरणे बदलली असती. मुख्यमंत्र्यांनी कालच पत्रकार परिषदेत 15 अपक्ष आमदार संपर्कात असल्याचे सांगितले आहे. या अपक्षांचा भाव वधारला असता. सध्या 28 अपक्ष व इतर निवडून आले आहेत. 

कोणत्या जागा गमावल्या? 

  • काँग्रेस : चिखली, खामगाव, अकोला पश्चिम, धामनगाव रेल, चिमुर, राळेगाव, अर्णी, फुलंब्री, चांदिवली, शिवाजीनगर, पुणे कँटेन्मेंट, तुळजापूर
  • राष्ट्रवादी : चाळीसगाव, जिंतूर, घणसावंगी, पैठण, नांदगाव, उल्हासनगर, दौंड, खडकवासला, गेवराई, उस्मानाबाद, माळशिरस
टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर