शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 08:13 IST

लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि खासदार ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र लढत होते. या दोघांच्या आघाडीला भाजपाची बी टीमही असे म्हटले गेले होते. maharashtra election results 2019

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र लढत होते. या दोन्ही पक्षांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. जवळपास 11 जागा वंचितमुळे गमवाव्या लागल्या होत्या. मात्र, विधानसभेलाही या दोन पक्षांचा फटका आघाडीला बसला आहे. या जागा एवढ्या आहेत की, भाजपा-शिवसेना युतीला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण बनणार होते. 

लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि खासदार ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र लढत होते. या दोघांच्या आघाडीला भाजपाची बी टीमही असे म्हटले गेले होते. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीची दलित, वंचित समाज आणि मुस्लिम अशी परंपरागत मते या पक्षांना जाणार होती. लोकसभेला याचा फटका बसला. विधानसभेला मात्र वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी तुटली. लोकसभेला या आघाडीचा एकमेव खासदार निवडून आला होता. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या जवळपास 11 जागा पडण्याएवढी मते या आघाडीने मिळविली होती. 

विधानसभेला आंबेडकर यांनी 288 पैकी 280 जागा मागितल्या आणि एमआयएमला 8 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने एमआयएमच्या खासदाराने आघाडी तुटल्याची घोषणा केली होती. यावर आंबेडकर यांनी ओवेसी यांचा निर्णय अंतिम असल्याचे म्हटले होते. मात्र, ओवेसींनीही यावर शिक्कामोर्तब केले होते. हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर विधानसभेला चित्र वेगळे दिसले असते. काल लागलेल्या निकालांमध्ये एमआयएमने 2 जागा जिंकल्या आहेत. या जागांवर एमआयएमचाच आमदार होता. तर वंचितला भोपळाही फोडता आलेला नाही. 

असे असले तरीही या दोन्ही पक्षांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. भाजपाला कालच्या निकालामध्ये 105 जागा, शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 44 आणि राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत. मनसेचा एकमेव उमेदवार जिंकला आहे. यानुसार युतीचे 161 आणि 98 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता होती. वंचित आणि एमआयएमने काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाडलेल्या जागा पाहता युतीला बहुमत गाठणे कठीण गेले असते. युती बहुमतापासून 16 जागांनी पुढे आहे. 

या दोन पक्षांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तब्बल 23 जागा गमवाव्या लागल्या आहेत. या जागांवर जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विजय झाला असता तर त्यांच्या 121 जागा झाल्या असत्या आणि युतीच्या 138 जागा. असे झाले असते तर सत्तेची समीकरणे बदलली असती. मुख्यमंत्र्यांनी कालच पत्रकार परिषदेत 15 अपक्ष आमदार संपर्कात असल्याचे सांगितले आहे. या अपक्षांचा भाव वधारला असता. सध्या 28 अपक्ष व इतर निवडून आले आहेत. 

कोणत्या जागा गमावल्या? 

  • काँग्रेस : चिखली, खामगाव, अकोला पश्चिम, धामनगाव रेल, चिमुर, राळेगाव, अर्णी, फुलंब्री, चांदिवली, शिवाजीनगर, पुणे कँटेन्मेंट, तुळजापूर
  • राष्ट्रवादी : चाळीसगाव, जिंतूर, घणसावंगी, पैठण, नांदगाव, उल्हासनगर, दौंड, खडकवासला, गेवराई, उस्मानाबाद, माळशिरस
टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर