शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 07:59 IST

Maharashtra Assembly Election 2024: रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून उचलबांगडी होण्यासाठी अहिल्यानगरचे प्रकरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून उचलबांगडी होण्यासाठी अहिल्यानगरचे प्रकरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

अहिल्यानगरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि विखे-पाटील समर्थक वसंत देशमुख यांनी जाहीर भाषणात अपशब्द वापरले होते. याप्रकरणी जयश्री थोरात यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी जयश्री आणि सोबतच्या महिलांना बराच काळ ठाण्याबाहेर थांबवले. तसेच जयश्री यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विरोधकांनी पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने दीपक मिश्रा, बी. आर. बालकृष्णन व राम मोहन मिश्रा या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथे निरीक्षक म्हणून पाठवले. या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून याप्रकरणी राज्य पातळीवरून दबाव आल्याचे नमूद केले होते.

फोन टॅप केल्याच्या आरोपांनंतर चर्चेत ■ शुक्ला यांच्यावर विरोधकांनी फोन टेंप केल्याचा आरोप सातत्याने केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्याच्या आरोपांनंतर शुक्ला चर्चेत आल्या होत्या.• राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शुक्ला अवैध फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता.• त्यामुळे निवडणुकीच्या काळात अशा व्यक्तीने राज्याच्या पोलीस महासंचाल कपदी राहू नये अशी मागणी काँग्रेस- कडून करण्यात आली होती.

मुदतवाढीतही अपवाद सहा महिन्यांपेक्षा कमी काळ शिल्लक असताना शुक्ला यांना २ वर्षे मुदतवाढ दिली. एखाद्या महासंचालकाला किमान सहा महिने निवृत्तीसाठी शिल्लक असतील तर दोन वर्षे मुदतवाढीचा लाभ मिळू शकतो. शुक्ला मात्र त्यास अपवाद ठरल्या होत्या. मविआने याबाबत आक्षेप घेतला होता.

नवे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी आलेले नवे पोलिस महासंचालक संजय वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते राज्याच्या कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. वर्मा न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. माझ्यावर जो विश्वास दाखवून जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल आभारी आहे. राज्यातील निवडणुका शांततापूर्ण मार्गाने पार पडतील या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येईल, असे संजय वर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४