शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 12:14 IST

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शा‍ब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रोळीतील राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय राऊत आक्रमक झालेत. 

मुंबई - राज ठाकरे काय म्हणतात, त्याला महाराष्ट्रात किंमत नाही. मोरारजी देसाई यांच्यानंतर राज ठाकरेंना गुजरात आणि महाराष्ट्राचं एकाचवेळी नेतृत्व करण्याची इच्छा आहे. परंतु महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार काही स्थान नाही अशी जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली आहे. 

आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोरारजी देसाई यांच्यानंतर राज ठाकरेच आहेत. महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाबद्दल राज ठाकरेंच्या मनात काय आहे याबाबत आमच्या मनात शंका कायम राहील. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा प्रचार करतायेत. उद्धव ठाकरे यांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. शरद पवारांची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते ज्या संघर्षाने महाराष्ट्रात उतरले आहेत. तो स्वत:च्या स्वार्थासाठी संघर्ष नसून ज्यापद्धतीने गुजरातच्या २ व्यापाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची जी लूट चालवली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे २ पक्ष फोडले आणि हे महाशय त्यांच्या बाजूने उभे आहेत. आम्हाला मोरारजी देसाई यांची आठवण झाली. हे दुर्दैव आहे. ते खूप महान नेते आहेत मला त्यांच्यावर बोलायचं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपण थोडे भान ठेवा. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच पण महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या गुजरातच्या २ व्यापाऱ्यांविरोधात त्यांची लढाई सुरू आहे अशा भाषेत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

कोण होते मोरारजी देसाई?

काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं विधान करणारे मोरारजी देसाई यांची भूमिका महाराष्ट्राच्या निर्मितीत आडमुठीपणाची राहिली. १९७७ साली देशात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं तेव्हा ते पंतप्रधान बनले होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. काँग्रेस पक्ष आणि त्यावेळचे नेते यांच्याविरोधामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. या लढ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा देत व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका सुरू ठेवली होती. त्यावेळी काँग्रेस सरकारने बाळासाहेब ठाकरेंच्या नावे अटक वॉरंट जारी केले होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSharad Pawarशरद पवारBJPभाजपा