शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:38 IST

मशि‍दीतून महाविकास आघाडीला मते करण्यासाठी फतवे काढले जातायेत, सत्ता आल्यास ४८ तासांत भोंगे हटवू असं विधान राज ठाकरेंनी केले त्यावर अबू आझमींनी पलटवार केला आहे. 

मुंबई - आयुष्यात राज ठाकरेंचं सरकार येणार नाही. अशी विधाने करणार्‍यांचे सरकार कधीही येऊ शकत नाही. हा देश पुरोगामी आहे. कोणी 'माई का लाल' अशाप्रकारे कायद्याचं उल्लंघन करून मशिदीतील भोंगे काढू शकत नाही. पोलिसांना बाजूला हटवा, कुठल्याही मशिदीत येण्याची हिंमत करून दाखवा असं खुलं चॅलेंज समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना दिले आहे.

सत्ता आली तर ४८ तासांत मशि‍दीवरील भोंगे हटवू असं विधान राज ठाकरे यांनी केले होते, त्यावरून अबू आझमी म्हणाले की, राज ठाकरेंनी पोलीस बाजूला हटवून मुंबईतल्या कुठल्याही मशिदीत येऊन दाखवावं. मानखुर्द शिवाजीनगरच्या मशिदीत या भोंगे हटवून दाखवा, तुम्ही स्वत:ला काय समजता, मुस्लीम सक्षम नाहीत? तुम्ही आम्हाला चॅलेंज करू नका. आम्ही कधी मंदिरात घुसून लाऊडस्पीकर उतरवू हे बोललो नाही. मंदिरावाल्यांना मारणार नाही बोललो. फालतू गोष्टी करू नका असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तर महाविकास आघाडी ही मुस्लीम लीग नाही. मुस्लिमांची वेगळी पार्टी नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस,  शरद पवार, उद्धव ठाकरे आहेत. जे या देशातील आहेत, त्यांना पाठिंबा दिला जात आहे. आम्ही मुस्लिमांचा पक्ष बनवत नाही. ज्या लोकांनी अत्याचार केले ते आमच्याकडून मतांची अपेक्षा कशी करता, यांना दु:ख का होतंय. व्होट जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद यासारख्या गोष्टी बोलल्या जातात. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशाप्रकारे भाषा वापरणे हे योग्य नाही. मी परळ लालबागला उभा राहिलो तर मला मते मिळतील का, प्रत्येकाची आपापली व्होटबँक असते. त्यांच्याकडे मते मागितली जातात. याचा त्रास इतरांना व्हायला नको असंही अबू आझमी यांनी म्हटलं. 

दरम्यान, महायुती आणि राज ठाकरेंकडे काही मुद्दे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार महाविकास आघाडी आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही महायुतीने भ्रष्टाचार केला. अशा लोकांना लाज वाटायला पाहिजे. जनतेला मूर्ख बनवण्याचं काम भाजपा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रिपदी असलेला व्यक्ती लोकांची दिशाभूल करणारी विधाने करतो. वक्फ बोर्डाची जमीन ही आमच्या पूर्वजांनी मशीद, मदरसा, दर्गा, हॉस्पिटल यांना दिलेल्या जमिनी आहेत. त्या जमिनीवर सरकारने कब्जा केला आहे. त्यावर सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालये उभारली. ही आमची जमीन आहे त्या हडपल्या आहेत. जनतेची दिशाभूल करणारे विधाने भाजपाकडून केली जात आहेत असा आरोप अबू आझमींनी केला.

...तर सरकार ताडकन् कोसळेल 

अबकी बार ४०० पार बोलणारे २३० वर आले, २ कुबड्या घेऊन सरकार चालतंय. जर या कुबड्या काढल्या तर सरकार ताडकन् कोसळेल. राज्यात महाविकास आघाडी सरकार येईल त्यानंतर यांचा पत्ता साफ होईल. २०१४ च्या आधी देशात बुरखा बंदीची भाषा झाली होती का? गाय-बैलाच्या नावाने मुस्लिमांना मारहाण व्हायची का, मॉब लिचिंगचे प्रकार याआधी व्हायचे का, गरीब मुस्लिमांना एकटं पकडून त्यांना दाढीवरून अल्लाहला शिवी द्या, जय श्री राम बोला असं जबरदस्तीने बोलायला लावायचे का या सर्व गोष्टी देशात घडतायेत. त्यामुळे केवळ उलेमा नाही तर देशातील सर्व लोक जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतात. त्यांचे अनुयायी आहेत त्यांनी यांच्याविरोधात एकत्र यायला हवं. भाजपा कोणाला वेड्यात काढू शकत नाही असं अबू आझमींनी सांगितले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगरmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकAbu Azmiअबू आझमीRaj Thackerayराज ठाकरेMuslimमुस्लीमBJPभाजपा