शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:38 IST

मशि‍दीतून महाविकास आघाडीला मते करण्यासाठी फतवे काढले जातायेत, सत्ता आल्यास ४८ तासांत भोंगे हटवू असं विधान राज ठाकरेंनी केले त्यावर अबू आझमींनी पलटवार केला आहे. 

मुंबई - आयुष्यात राज ठाकरेंचं सरकार येणार नाही. अशी विधाने करणार्‍यांचे सरकार कधीही येऊ शकत नाही. हा देश पुरोगामी आहे. कोणी 'माई का लाल' अशाप्रकारे कायद्याचं उल्लंघन करून मशिदीतील भोंगे काढू शकत नाही. पोलिसांना बाजूला हटवा, कुठल्याही मशिदीत येण्याची हिंमत करून दाखवा असं खुलं चॅलेंज समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना दिले आहे.

सत्ता आली तर ४८ तासांत मशि‍दीवरील भोंगे हटवू असं विधान राज ठाकरे यांनी केले होते, त्यावरून अबू आझमी म्हणाले की, राज ठाकरेंनी पोलीस बाजूला हटवून मुंबईतल्या कुठल्याही मशिदीत येऊन दाखवावं. मानखुर्द शिवाजीनगरच्या मशिदीत या भोंगे हटवून दाखवा, तुम्ही स्वत:ला काय समजता, मुस्लीम सक्षम नाहीत? तुम्ही आम्हाला चॅलेंज करू नका. आम्ही कधी मंदिरात घुसून लाऊडस्पीकर उतरवू हे बोललो नाही. मंदिरावाल्यांना मारणार नाही बोललो. फालतू गोष्टी करू नका असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तर महाविकास आघाडी ही मुस्लीम लीग नाही. मुस्लिमांची वेगळी पार्टी नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस,  शरद पवार, उद्धव ठाकरे आहेत. जे या देशातील आहेत, त्यांना पाठिंबा दिला जात आहे. आम्ही मुस्लिमांचा पक्ष बनवत नाही. ज्या लोकांनी अत्याचार केले ते आमच्याकडून मतांची अपेक्षा कशी करता, यांना दु:ख का होतंय. व्होट जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद यासारख्या गोष्टी बोलल्या जातात. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशाप्रकारे भाषा वापरणे हे योग्य नाही. मी परळ लालबागला उभा राहिलो तर मला मते मिळतील का, प्रत्येकाची आपापली व्होटबँक असते. त्यांच्याकडे मते मागितली जातात. याचा त्रास इतरांना व्हायला नको असंही अबू आझमी यांनी म्हटलं. 

दरम्यान, महायुती आणि राज ठाकरेंकडे काही मुद्दे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार महाविकास आघाडी आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही महायुतीने भ्रष्टाचार केला. अशा लोकांना लाज वाटायला पाहिजे. जनतेला मूर्ख बनवण्याचं काम भाजपा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रिपदी असलेला व्यक्ती लोकांची दिशाभूल करणारी विधाने करतो. वक्फ बोर्डाची जमीन ही आमच्या पूर्वजांनी मशीद, मदरसा, दर्गा, हॉस्पिटल यांना दिलेल्या जमिनी आहेत. त्या जमिनीवर सरकारने कब्जा केला आहे. त्यावर सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालये उभारली. ही आमची जमीन आहे त्या हडपल्या आहेत. जनतेची दिशाभूल करणारे विधाने भाजपाकडून केली जात आहेत असा आरोप अबू आझमींनी केला.

...तर सरकार ताडकन् कोसळेल 

अबकी बार ४०० पार बोलणारे २३० वर आले, २ कुबड्या घेऊन सरकार चालतंय. जर या कुबड्या काढल्या तर सरकार ताडकन् कोसळेल. राज्यात महाविकास आघाडी सरकार येईल त्यानंतर यांचा पत्ता साफ होईल. २०१४ च्या आधी देशात बुरखा बंदीची भाषा झाली होती का? गाय-बैलाच्या नावाने मुस्लिमांना मारहाण व्हायची का, मॉब लिचिंगचे प्रकार याआधी व्हायचे का, गरीब मुस्लिमांना एकटं पकडून त्यांना दाढीवरून अल्लाहला शिवी द्या, जय श्री राम बोला असं जबरदस्तीने बोलायला लावायचे का या सर्व गोष्टी देशात घडतायेत. त्यामुळे केवळ उलेमा नाही तर देशातील सर्व लोक जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतात. त्यांचे अनुयायी आहेत त्यांनी यांच्याविरोधात एकत्र यायला हवं. भाजपा कोणाला वेड्यात काढू शकत नाही असं अबू आझमींनी सांगितले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगरmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकAbu Azmiअबू आझमीRaj Thackerayराज ठाकरेMuslimमुस्लीमBJPभाजपा