शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:37 IST

आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा हा धोकादायक डाव अयशस्वी करायचा आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले. 

धुळे - काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी संघर्ष करण्याचा धोकादायक खेळ खेळला जातोय. हा खेळ यासाठी आहे कारण काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना पुढे येताना पाहू शकत नाही. हाच काँग्रेसचा इतिहास आहे. स्वातंत्र्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना, वंचितांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण लागू केले, त्यांना संघर्ष करावा लागला असं सांगत काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करण्याचा डाव रचत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

धुळे येथील जाहीर सभेत मोदींनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर घणाघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, SC, ST आणि OBC कमकुवत राहावा असेच काँग्रेसला नेहमी वाटते. राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षणाचा उघडपणे विरोध केला होता. जर एससी, एसटी आणि ओबीसी हा समाज एकजूट झाला तर काँग्रेसच्या राजकीय दुकानदारीचं शटर बंद होईल असं त्यांना वाटत होते. राजीव गांधीनंतर आता कुटुंबाची चौथी पिढी या धोकादायक प्रवृत्तीने त्यांचे युवराज काम करत आहेत. काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे, कुठल्याही प्रकारे एससी, एसटी, ओबीसी समाजाची एकजूट तोडावी असंही त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय SC समाज विविध जातीत विखुरला जावा, जेणेकरून त्यांची सामुहिक शक्ती कमी पडेल. ओबीसी समाजही वेगवेगळ्या जातीत विभागला जावा जेणेकरून ओबीसींची एकजुटता कायम राहिली तर त्यांची ताकद वाढेल. ही ताकद वाढू नये म्हणून ओबीसी समाजाला जाती जातीत विखुरण्याचा प्रयत्न केला जात आहे. एसटी समाजही वेगवेगळ्या जातीत विभागला जावा. आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाज एकत्रितपणे एकजूट पुढे आले आहे. ते मजबुतीने त्यांचा आवाज उचलू नये त्यासाठी त्यांना जातीत विखुरले जावे हा काँग्रेसचा डाव असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस छोट्या छोट्या जातींना एकमेकांशी लढवत आहे. आदिवासींची ओळख, दलितांची एकता हे तोडण्यामागे काँग्रेस लागली आहे. आदिवासी समाजाची एकजूटता काँग्रेसला पाहवत नाही. देशातील आदिवासी समुह एकमेकांशी संघर्ष करावा. त्यातून त्यांचा सामुहिक ताकद कमी व्हावी. काँग्रेसने धर्माच्या नावावर असे षडयंत्र रचले तेव्हा देशाचे विभाजन झाले. आता काँग्रेस एससी, एसटी, ओबीसीतल्या जातींना एकमेकांविरोधात लढवत आहे. भारताविरोधात इतकं मोठं षडयंत्र दुसरं असू शकत नाही. आदिवासी एकजूट राहिला तर त्याची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातीत विभागला गेला तर कमकुवत व्हाल, त्यामुळे एक आहात तर सेफ आहात असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dhule-city-acधुळे शहरnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसOBCअन्य मागासवर्गीय जातीSC STअनुसूचित जाती जमाती