शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:31 IST

शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे. 

मुंबई - कुटुंबप्रमुख असण्याचा हक्क फक्त शब्दांत नाही, कृतीतही दिसावा. आम्हाला कुटुंबातील उणेदुणे काढायची नाहीत परंतु उद्धव ठाकरे तुम्ही काल मुलाखतीत म्हणालात ना? की मागच्या शस्त्रक्रियेवेळी राज आला होता. यावेळी आला नाही. त्यांच्या येण्याची अपेक्षा ठेवता ना? मग खाली दिलेली यादी वाचाच "कुटुंबप्रमुख" असं सांगत माहीमचे मनसे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले आहेत. 

यशवंत किल्लेदार यांनी फेसबुक पोस्ट लिहून म्हटलंय की, अमित ठाकरे आजारी गंभीर असताना राज ठाकरेंचे नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला आजारपण आठवले नाही. तेव्हा कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, राज ठाकरेंची कन्या उर्वशीचा अपघात झाला? तेव्हा कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, कोविडमध्ये तुमची शस्त्रक्रिया झाली तेव्हा मातोश्रीवर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत. कारण काय? कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली त्यावर तुमच्याकडून एकही फोन नाही. भेट नाही, काय झालं? कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, शर्मिला वहिनींच्या चेहऱ्यावर एका अपघाताने प्रचंड मोठी शस्त्रक्रिया झाली. तेव्हा कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख? असा सवाल त्यांनी विचारले आहेत. 

त्याशिवाय आदित्य निवडून आले. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले पण ज्या काकांनी उमेदवार दिला नाही. त्या काकांना धन्यवाद बोलायला आजवर वेळ मिळाला नाही. आदित्यला शिकवण देताना. कुठे होता तुमच्यातल्या कुटुंबप्रमुख?, २००५ च्या महापुरात बाळासाहेब ठाकरेंना एकटे सोडून सहकुटुंब तुम्ही हॉटेलात राहायला गेलात. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना एकटं पडू न देता त्यांना आपल्या घरी घेऊन आले ते राज ठाकरे. तेव्हा कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत राज ठाकरेंसोबत घाणेरडं राजकारण केलं गेलं. ह्या दुःखद प्रसंगात राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली गेली. तेव्हा पुढे येऊन हे सगळं का थांबवलं नाही? कुठे होता तुमच्यातला कुटुंबप्रमुख?, राज ठाकरेंचा एक साधा विनोद सहन होत नसेल तर राजकारण सोडून घरी बसा. राज ठाकरेंबाबत बोलाल तर तशीच उत्तरे मिळणार असा पलटवार मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.

दरम्यान, मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यात आतलेही आहेत, बाहेरचेही आहेत. सगळे जणच प्रयत्न करताहेत. माझ्याकडून मी अलर्ट असतो. अनेक गोष्टी माझ्या कानावर येतात. हा असे बोलला.. तो असे म्हणाला. अशा गोष्टी मला कळतात. पण, असल्या गोष्टी मी ऐकत नाही. दोघे एकत्र व्हावे असे वाटणे वेगळे. असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. समोरून त्यांच्याकडून काही लोक काही तरी बोलत असतात, सांगत असतात. करत असतात. माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे. तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात. पण, उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते, भाऊ वाटत नाही. यावर माझ्याकडे बोलण्यासारखे काय असू शकेल असं विधान राज ठाकरेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mahim-acमाहीमmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmit Thackerayअमित ठाकरे