शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 13:07 IST

षडयंत्र करून त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपापासून दूर केले हे आता स्वत: शरद पवार कबुल करत आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला. 

मुंबई - भाजपाला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपापासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. २०१४ साली भाजपाला पाठिंबा देण्यावरून एका मुलाखतीत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवारांनी या प्रश्नावर खुलासा केला.

२०१४ साली भाजपाने न मागता तुमच्या पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला होता, त्यामागे काय हेतू होता असा प्रश्न पत्रकाराने मुलाखतीत विचारला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, विनाकारण नाही, तर २०१४ साली भाजपाला आम्हाला पाठिंबा द्यायचा नव्हताच. आम्हाला केवळ शिवसेना आणि भाजपा यांची जी युती होती त्यांना वेगळे कसं करता येईल. करू शकतो का हे आम्हाला पाहायचे होते. त्यासाठी चाचपणी म्हणून आम्ही राजकीय विधान केले आम्ही त्यांना मदत कधी केली नाही. केवळ विधान केले होते मात्र त्या विधानानंतर जसं आम्हाला हवं होते तेच झाले. भाजपा गेले आणि शिवसेना आमच्यासोबत आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले असं विधान पवारांनी केले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी यावर भाष्य केले.

तर शरद पवार वारंवार रोज नवीन गोष्टी सांगत आहेत. षडयंत्र करून त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपापासून दूर केले हे आता स्वत: शरद पवार कबुल करत आहेत. २०१९ ला भाजपा-राष्ट्रवादीची बैठक झाली ते त्यांनी अमान्य केले होते. मी २०२० पासून या बैठकीबाबत सांगत आहे. मी स्पष्ट सांगितले, गौतम अदानी बैठकीत नव्हते, ही बैठक दिल्लीत झाली होती असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

२०१४ साली काय घडलं होतं?

२०१४ साली भाजपा-शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे प्रमुख पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर निकालाच्या दिवशीच शरद पवारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांना येऊन आम्ही भाजपाला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ असं विधान केले. त्यानंतर विधानसभेत भाजपाने बहुमत सिद्ध केले. तेव्हा शिवसेना विरोधी बाकांवर बसली होती. विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे काम करत होते. मात्र काही महिन्यातच विरोधी बाकांवरील शिवसेना भाजपासोबत सत्तेत आली. त्यानंतर २०१९ पर्यंत शिवसेना-भाजपाने सरकार चालवले. परंतु २०१९ च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रि‍पदावरून शिवसेना भाजपात बिनसले आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी बनली आणि राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस