शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

असा एक तरी सर्व्हे दाखवा ज्यात...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जमिनीवरची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:00 IST

विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

मुंबई - भाजपाचा सर्व्हे मला माहिती नाही; पण जगाला, देशाला, पत्रकारांना माहिती पडतो. हा सर्व्हे कोणता..? मला असा एक तरी सर्व्हे दाखवा त्यात काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळतील असं दाखवलं आहे. भाजपाच्या सर्व्हेत पक्षाला संतोषजनक वातावरण आहे. प्रत्येक सर्व्हेत आम्हाला आमच्या जागा वाढलेल्या दिसताहेत. कुठेही नकरात्मक सर्व्हे नाही. अतिशय पॉझिटिव्ह सर्व्हे असून विजयाकडे घेऊन जाणारा हा सर्व्हे आहे, असं विधान भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि सहयोगी संपादक यदु जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेवेळी अपेक्षाकृत आमच्या लोकांची नाराजी जास्त होती. आम्ही अजितदादांना सोबत घेतले तेव्हा इतकी नाराजी असेल वाटलं नव्हतं. परंतु आज तशी परिस्थिती नाही. बेरजेचे राजकारण काय आहे हे आम्ही आमच्या मतदारांना, संघटनांना समजावू शकलो आहोत. त्यामुळे ८० टक्के मनाने, २० टक्के शिस्तीने मतदार आमच्यासोबत आहेत. अजितदादा सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धीविनायकला जातात. जेव्हा आम्ही हिंदुत्व मांडतो तेव्हा ते कधी प्रतिवाद करत नाहीत. अजितदादा आमच्याकडे आल्याने त्यांच्यात परिवर्तन होतंय हे दिसून येतं. ही निवडणूक चुरशीची असेल. विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रत्येकाला आपापला पक्ष आहे, त्यामुळे जास्त जागा मिळाव्यात असा आग्रह असतो. कार्यकर्त्यांचाही असतो. महाविकास आघाडीशी तुलना करता आम्ही सामंजस्याने जागावाटप केले. पहिल्या २ चर्चांमध्ये आमचं २४० जागांचं वाटप झालं होतं. ४८ जागांपैकी ३८ जागांवर तिसऱ्या चर्चेत तोडगा निघाला. १० जागांवर निश्चितपणे आम्हाला त्रास झाला. शेवटी त्याचा निकालही आम्ही लावला आहे. महायुतीत आम्हाला १६०-१६५ जागांची अपेक्षा होती. परंतु १५२ जागा मिळाल्या. महायुतीत तीन पक्ष लढत असताना १५२ जागा मिळणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे, असं फडणवीसांनी नमूद केलं. 

५० वर्षं राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही एक दिवस हे स्वप्न पूर्ण करू शकतो अशा ताकदीने काम करायचे. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा राम मंदिर उभं राहिले. त्यामुळे शत प्रतिशत भाजपा एका दिवसात होऊ शकत नाही. लोकांचा विश्वास आम्हाला अधिक कमवावा लागेल. आज महाराष्ट्रात जे काही युतीचे राजकारण आहे त्याला पर्याय नाही. भाजपाची ताकद आहे, पण केवळ ताकदीवर निवडून येऊ शकतो का तर असं नाही. आम्हाला मित्रांची गरज आहे. त्यामुळे आम्ही मित्रांसोबत लढतोय असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 

भाजपा तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतं, परंतु...

राजकारणात अनेकांना वाटतं, ही निवडणूक आपण लढलो नाही तर ही जीवनातील अंतिम निवडणूक आहे असं वाटते. अलीकडच्या काळात राजकीय कार्यकर्ते थांबण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे पक्षातून लोक जातात. सगळ्याच पक्षातून जात असतात पण सरसकट असं होत नाही. आज आमच्या पक्षात अनेकांनी अर्ज भरले, ते माघारी घेताहेत. भाजपात जे तत्त्व आम्ही सांगतो, ते पाळतोही. सत्तेचं राजकारण असल्याने जितकं जास्त असेल तितकं तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतो असं फडणवीसांनी म्हटलं. 

शरद पवारांमधील परिवर्तन स्वागतार्ह 

राजकारणाची जी दिशा मोदींनी बदलली, राजकीय नेते ईश्वराचे भक्त होते, धार्मिक होते पण ते लपून लपून करायचे. मंदिरात गेल्यावर पुरोगामी प्रतिमा खराब होतेय असं त्यांना वाटायचे. मोदींमुळे ते नेते मंदिरात उघड जाऊ लागले. वारीत जाणार, मंदिरात जाणार हे शरद पवारांचे परिवर्तन स्वागतार्ह आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

पाहा व्हिडिओ

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती