शहरं
Join us  
Trending Stories
1
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ५ जण दगावल्याची भीती
2
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
3
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
4
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
6
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
7
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
8
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
9
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
10
Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
11
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
12
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
13
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
14
हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
15
Smriti Mandhana: "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
16
मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी
17
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
18
हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
19
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
20
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
Daily Top 2Weekly Top 5

असा एक तरी सर्व्हे दाखवा ज्यात...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जमिनीवरची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:00 IST

विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

मुंबई - भाजपाचा सर्व्हे मला माहिती नाही; पण जगाला, देशाला, पत्रकारांना माहिती पडतो. हा सर्व्हे कोणता..? मला असा एक तरी सर्व्हे दाखवा त्यात काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळतील असं दाखवलं आहे. भाजपाच्या सर्व्हेत पक्षाला संतोषजनक वातावरण आहे. प्रत्येक सर्व्हेत आम्हाला आमच्या जागा वाढलेल्या दिसताहेत. कुठेही नकरात्मक सर्व्हे नाही. अतिशय पॉझिटिव्ह सर्व्हे असून विजयाकडे घेऊन जाणारा हा सर्व्हे आहे, असं विधान भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि सहयोगी संपादक यदु जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेवेळी अपेक्षाकृत आमच्या लोकांची नाराजी जास्त होती. आम्ही अजितदादांना सोबत घेतले तेव्हा इतकी नाराजी असेल वाटलं नव्हतं. परंतु आज तशी परिस्थिती नाही. बेरजेचे राजकारण काय आहे हे आम्ही आमच्या मतदारांना, संघटनांना समजावू शकलो आहोत. त्यामुळे ८० टक्के मनाने, २० टक्के शिस्तीने मतदार आमच्यासोबत आहेत. अजितदादा सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धीविनायकला जातात. जेव्हा आम्ही हिंदुत्व मांडतो तेव्हा ते कधी प्रतिवाद करत नाहीत. अजितदादा आमच्याकडे आल्याने त्यांच्यात परिवर्तन होतंय हे दिसून येतं. ही निवडणूक चुरशीची असेल. विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रत्येकाला आपापला पक्ष आहे, त्यामुळे जास्त जागा मिळाव्यात असा आग्रह असतो. कार्यकर्त्यांचाही असतो. महाविकास आघाडीशी तुलना करता आम्ही सामंजस्याने जागावाटप केले. पहिल्या २ चर्चांमध्ये आमचं २४० जागांचं वाटप झालं होतं. ४८ जागांपैकी ३८ जागांवर तिसऱ्या चर्चेत तोडगा निघाला. १० जागांवर निश्चितपणे आम्हाला त्रास झाला. शेवटी त्याचा निकालही आम्ही लावला आहे. महायुतीत आम्हाला १६०-१६५ जागांची अपेक्षा होती. परंतु १५२ जागा मिळाल्या. महायुतीत तीन पक्ष लढत असताना १५२ जागा मिळणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे, असं फडणवीसांनी नमूद केलं. 

५० वर्षं राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही एक दिवस हे स्वप्न पूर्ण करू शकतो अशा ताकदीने काम करायचे. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा राम मंदिर उभं राहिले. त्यामुळे शत प्रतिशत भाजपा एका दिवसात होऊ शकत नाही. लोकांचा विश्वास आम्हाला अधिक कमवावा लागेल. आज महाराष्ट्रात जे काही युतीचे राजकारण आहे त्याला पर्याय नाही. भाजपाची ताकद आहे, पण केवळ ताकदीवर निवडून येऊ शकतो का तर असं नाही. आम्हाला मित्रांची गरज आहे. त्यामुळे आम्ही मित्रांसोबत लढतोय असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 

भाजपा तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतं, परंतु...

राजकारणात अनेकांना वाटतं, ही निवडणूक आपण लढलो नाही तर ही जीवनातील अंतिम निवडणूक आहे असं वाटते. अलीकडच्या काळात राजकीय कार्यकर्ते थांबण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे पक्षातून लोक जातात. सगळ्याच पक्षातून जात असतात पण सरसकट असं होत नाही. आज आमच्या पक्षात अनेकांनी अर्ज भरले, ते माघारी घेताहेत. भाजपात जे तत्त्व आम्ही सांगतो, ते पाळतोही. सत्तेचं राजकारण असल्याने जितकं जास्त असेल तितकं तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करतो असं फडणवीसांनी म्हटलं. 

शरद पवारांमधील परिवर्तन स्वागतार्ह 

राजकारणाची जी दिशा मोदींनी बदलली, राजकीय नेते ईश्वराचे भक्त होते, धार्मिक होते पण ते लपून लपून करायचे. मंदिरात गेल्यावर पुरोगामी प्रतिमा खराब होतेय असं त्यांना वाटायचे. मोदींमुळे ते नेते मंदिरात उघड जाऊ लागले. वारीत जाणार, मंदिरात जाणार हे शरद पवारांचे परिवर्तन स्वागतार्ह आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

पाहा व्हिडिओ

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती