शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:45 IST

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान काही दिवसांवर आलं आहे. त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली आहे. महायुती, महाविकास आघाडी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या वाढली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ही मते मिळवण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वात महायुती आणि काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीसह घटक पक्षांनी उत्तर भारतीय चेहरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहेत. मुंबईतील जागांवर सर्वाधिक उत्तर भारतीय उमेदवार नशीब आजमवत आहेत. 

जवळपास १४ उत्तर भारतीय उमेदवार विविध पक्षांकडून मुंबईत निवडणूक लढवत आहेत. ज्यात काही जागांवर उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय अशी थेट लढत आहे. नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, भिवंडीसारख्या भागातही उत्तर भारतीय नेते निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. भाजपाने त्यांचा सुरक्षित गड मानला जाणाऱ्या बोरिवली विधानसभेत उत्तर भारतीय नेते संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय वसईत स्नेहा दुबे पंडित यांना भाजपाने तिकिट दिले आहे. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास आठवले यांनी उत्तर भारतीय नेते अमरजित सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गोरेगाव विधानसभेत भाजपाने विद्या ठाकूर यांना तिसऱ्यांदा तिकिट दिले आहे. 

भाजपाचा मित्रपक्ष शिवसेना यांनी दिंडोशी मतदारसंघात माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही उत्तर भारतीय उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसनं चारकोप येथील मतदारसंघात उत्तर भारतीय नेते यशवंत सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजपाचे योगेश सागर आणि मनसेचे दिनेश साळवी यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. नालासोपारा मतदारसंघात संदीप पांडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. अणुशक्तीनगर जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सना मलिक तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना उमेदवार बनवले आहे. मानखुर्द शिवाजीनगर येथे समाजवादी पक्षाने अबु आझमी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना तिकिट दिले आहे. वांद्रे पूर्व येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी निवडणुकीत उभे आहेत.

उत्तर भारतीय मते कुणाला?

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत. मुंबईतील ३६ पैकी २२ मतदारसंघात उत्तर भारतीय मते निर्णायक आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील १८ लाख स्थलांतरित आता मुंबईचे मतदार बनले आहेत. कलिना, कुर्ला, दहिसर, चारकोप, कांदिवली पूर्व, बोरिवली, मागाठणे, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व यासह शहरातील विविध मतदारसंघात त्यांचे प्रभावी मतदान आहे. 

मुंबईनंतर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथेही उत्तर भारतीय मतदार आहेत. रोजगारासाठी बहुतांश उत्तर भारतीय महाराष्ट्रात स्थलांतरित झाला आहे. हे मतदार स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय पक्षांना पसंती देतात. कृपाशंकर सिंह, संजय निरुपम, राजहंस सिंह यासारख्या उत्तर भारतीय नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाला साथ दिली. त्यामुळे मोठा मतदार भाजपाकडे वळला. आता काँग्रेसमध्ये नसीम खान, उद्धव ठाकरे गटाकडून आनंद दुबे यासारखे उत्तर भारतीय चेहरे पुढे येत आहेत.  

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी