शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:45 IST

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान काही दिवसांवर आलं आहे. त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली आहे. महायुती, महाविकास आघाडी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या वाढली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ही मते मिळवण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वात महायुती आणि काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीसह घटक पक्षांनी उत्तर भारतीय चेहरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहेत. मुंबईतील जागांवर सर्वाधिक उत्तर भारतीय उमेदवार नशीब आजमवत आहेत. 

जवळपास १४ उत्तर भारतीय उमेदवार विविध पक्षांकडून मुंबईत निवडणूक लढवत आहेत. ज्यात काही जागांवर उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय अशी थेट लढत आहे. नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, भिवंडीसारख्या भागातही उत्तर भारतीय नेते निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. भाजपाने त्यांचा सुरक्षित गड मानला जाणाऱ्या बोरिवली विधानसभेत उत्तर भारतीय नेते संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय वसईत स्नेहा दुबे पंडित यांना भाजपाने तिकिट दिले आहे. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास आठवले यांनी उत्तर भारतीय नेते अमरजित सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गोरेगाव विधानसभेत भाजपाने विद्या ठाकूर यांना तिसऱ्यांदा तिकिट दिले आहे. 

भाजपाचा मित्रपक्ष शिवसेना यांनी दिंडोशी मतदारसंघात माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही उत्तर भारतीय उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसनं चारकोप येथील मतदारसंघात उत्तर भारतीय नेते यशवंत सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजपाचे योगेश सागर आणि मनसेचे दिनेश साळवी यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. नालासोपारा मतदारसंघात संदीप पांडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. अणुशक्तीनगर जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सना मलिक तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना उमेदवार बनवले आहे. मानखुर्द शिवाजीनगर येथे समाजवादी पक्षाने अबु आझमी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना तिकिट दिले आहे. वांद्रे पूर्व येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी निवडणुकीत उभे आहेत.

उत्तर भारतीय मते कुणाला?

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत. मुंबईतील ३६ पैकी २२ मतदारसंघात उत्तर भारतीय मते निर्णायक आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील १८ लाख स्थलांतरित आता मुंबईचे मतदार बनले आहेत. कलिना, कुर्ला, दहिसर, चारकोप, कांदिवली पूर्व, बोरिवली, मागाठणे, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व यासह शहरातील विविध मतदारसंघात त्यांचे प्रभावी मतदान आहे. 

मुंबईनंतर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथेही उत्तर भारतीय मतदार आहेत. रोजगारासाठी बहुतांश उत्तर भारतीय महाराष्ट्रात स्थलांतरित झाला आहे. हे मतदार स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय पक्षांना पसंती देतात. कृपाशंकर सिंह, संजय निरुपम, राजहंस सिंह यासारख्या उत्तर भारतीय नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाला साथ दिली. त्यामुळे मोठा मतदार भाजपाकडे वळला. आता काँग्रेसमध्ये नसीम खान, उद्धव ठाकरे गटाकडून आनंद दुबे यासारखे उत्तर भारतीय चेहरे पुढे येत आहेत.  

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी