शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:45 IST

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान काही दिवसांवर आलं आहे. त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली आहे. महायुती, महाविकास आघाडी प्रत्येक पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या वाढली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ही मते मिळवण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वात महायुती आणि काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीसह घटक पक्षांनी उत्तर भारतीय चेहरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहेत. मुंबईतील जागांवर सर्वाधिक उत्तर भारतीय उमेदवार नशीब आजमवत आहेत. 

जवळपास १४ उत्तर भारतीय उमेदवार विविध पक्षांकडून मुंबईत निवडणूक लढवत आहेत. ज्यात काही जागांवर उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय अशी थेट लढत आहे. नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, भिवंडीसारख्या भागातही उत्तर भारतीय नेते निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. भाजपाने त्यांचा सुरक्षित गड मानला जाणाऱ्या बोरिवली विधानसभेत उत्तर भारतीय नेते संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय वसईत स्नेहा दुबे पंडित यांना भाजपाने तिकिट दिले आहे. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास आठवले यांनी उत्तर भारतीय नेते अमरजित सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गोरेगाव विधानसभेत भाजपाने विद्या ठाकूर यांना तिसऱ्यांदा तिकिट दिले आहे. 

भाजपाचा मित्रपक्ष शिवसेना यांनी दिंडोशी मतदारसंघात माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही उत्तर भारतीय उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसनं चारकोप येथील मतदारसंघात उत्तर भारतीय नेते यशवंत सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजपाचे योगेश सागर आणि मनसेचे दिनेश साळवी यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. नालासोपारा मतदारसंघात संदीप पांडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. अणुशक्तीनगर जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सना मलिक तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना उमेदवार बनवले आहे. मानखुर्द शिवाजीनगर येथे समाजवादी पक्षाने अबु आझमी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना तिकिट दिले आहे. वांद्रे पूर्व येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी निवडणुकीत उभे आहेत.

उत्तर भारतीय मते कुणाला?

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत. मुंबईतील ३६ पैकी २२ मतदारसंघात उत्तर भारतीय मते निर्णायक आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील १८ लाख स्थलांतरित आता मुंबईचे मतदार बनले आहेत. कलिना, कुर्ला, दहिसर, चारकोप, कांदिवली पूर्व, बोरिवली, मागाठणे, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व यासह शहरातील विविध मतदारसंघात त्यांचे प्रभावी मतदान आहे. 

मुंबईनंतर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथेही उत्तर भारतीय मतदार आहेत. रोजगारासाठी बहुतांश उत्तर भारतीय महाराष्ट्रात स्थलांतरित झाला आहे. हे मतदार स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय पक्षांना पसंती देतात. कृपाशंकर सिंह, संजय निरुपम, राजहंस सिंह यासारख्या उत्तर भारतीय नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाला साथ दिली. त्यामुळे मोठा मतदार भाजपाकडे वळला. आता काँग्रेसमध्ये नसीम खान, उद्धव ठाकरे गटाकडून आनंद दुबे यासारखे उत्तर भारतीय चेहरे पुढे येत आहेत.  

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी