शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 10:16 IST

Loksabha Election - उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर टीका करत भाजपाला पराभवाची भीती आहे, त्यामुळे पंतप्रधानांना रस्त्यावर फिरण्याची वेळ आलीय असा आरोप केला.

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) भाजपा निवडणूक माफिया आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणं हे त्यांना महत्त्वाचे आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी कधी सांभाळणार, रोड शो करणं त्यांचे काम नाही. पराभवाची भीती असल्याने हे सुरू आहे. जिथे जिथे मोदी जातील तिथे शिवसेना महाविकास आघाडी जिंकणार आहे. १ नव्हे ४ रोड शो करा, जिथे मोदी जातील तिथे आम्ही जिंकू हे सूत्र आहे असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. 

संजय राऊत म्हणाले की, तुमच्यावर दारोदार भटकण्याची आणि रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे लोकांना कळू द्या. पंतप्रधान देशभरात रोड शो करतात, त्यांना दुसरं काम नाही का? घाटकोपरला १८ मृत्यू झाले तिथे जाऊन अश्रू ढाळण्याचं नाटक ते करतील. महाराष्ट्रातील जनतेनं मोदी गो बॅक अशी घोषणा दिली आहे. मोदी नको अशी भावना जनतेत आहे. जिथे मतदान झालंय तिथल्या ९० टक्के जागा मविआ जिंकतेय. उर्वरित जागा महाविकास आघाडी जिंकतेय. मोदी ब्रँड संपलाय, ४ जूननंतर झुला घेऊन मोदींना हिमालयात जायचंय असंही त्यांनी सांगितले. 

तसेच प्रफुल पटेल यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप डोक्यावर घालून घेतला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मोदी महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहतंय. ज्याच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप आहे त्यांच्याकडून अशाप्रकारे जिरेटोप घालून छत्रपतींचा अवमान केला जातोय या घटनेकडे महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने पाहतेय असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीनं देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणलं आहे. गल्लीगल्लीत, रस्त्यावर पंतप्रधानांना भाजपावाले पराभवाच्या भीतीनं फिरवत आहेत. मुंबईतल्या ६ जागांवर आम्ही लढतोय. त्यातल्या ६ पैकी ६ जागा जिंकण्याचा आमचा इरादा आहे. मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागतंय. नाशिक, कल्याण आणि घाटकोपर इथं येणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावी पॅटर्न राबवला गेला. त्यांच्या नेतृत्वात धारावीतून कोरोना हद्दपार झाला. त्याचे श्रेय जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. त्यावर दुसऱ्याने बोलण्याची गरज नाही असं संजय राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४mumbai-north-east-pcमुंबई उत्तर पूर्व