शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयांत थाळी यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या मोठ्या घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 18:18 IST

Maharashtra Government : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि १० रुपयांत थाळीसह काही मोठ्या घोषणा केल्या, त्यांचा आढावा पुढीलप्रमाणे...

नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या  घोषणांचा वर्षाव केला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली.  शिवसेनेने दिलेल्या आश्वसानाप्रमाणे राज्यात १० रुपयात थाळी देण्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. त्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  विदर्भ आणि संपूर्ण राज्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत.  उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मोठ्या घोषणा - शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल, ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच सर्व थकीत कर्ज माफ करू- प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल- गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार-सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही- गोसी खुर्द प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करणार- यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार- विदर्भात १२३ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे-  समुद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार, कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल- आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार- धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिकचे २०० रुपये देणार-  पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी