शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मशालींच्या प्रकाशात उजळला किल्ले रायगड, पहिला दिवा महाराजांच्या चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 07:34 IST

आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमामुळे दिवाळी साजरी होते. महाराज आणि मावळे यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांनी तब्बल ३४५ मशाली प्रज्वलित करून

मुंबई : आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमामुळे दिवाळी साजरी होते. महाराज आणि मावळे यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांनी तब्बल ३४५ मशाली प्रज्वलित करून हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ उजाळला. ‘पहिला दिवा महाराजांच्या चरणी त्यानंतर आपल्या घरी’ या निर्धाराने शिवभक्तांनी दिवाळीची पहिली पणती राजदरबारामध्ये प्रज्वलित करून रविवारी शिवचैतन्य सोहळा साजरा केला.दरवर्षी ऐन दिवाळीत किल्ले रायगड अंधारात राहतो. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड या संस्थेच्या वतीने सलग सहाव्या वर्षी किल्ले रायगड मशालींच्या प्रकाशात उजाळण्यात आला. या देदीप्यमान सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित झाले होते.पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित असलेल्या शिवभक्तांमध्ये तरुणांचा वर्ग मोठ्या प्रमाणात होता. मशालींच्या उजेडात सर्वप्रथम गडदेवता शिर्काई देवीची पूजा झाल्यानंतर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ‘एक व्यक्ती, एक मशाल’ याप्रमाणे ३४५ मशाली प्रज्वलित करून महाराजांना मानवंदना देण्यात आली.याआधी राजसदर, शिर्काई मंदिर, जगदिश्वर मंदिर, महाराजांची समाधीस्थळ, वाडेश्वर मंदिर, बाजारपेठ, भवानी कडा यांसारख्या प्रमुख स्थळांवर साफसफाई करून रांगोळ्यांसह फुलांची सजावट करण्यात आली.तसेच, शिवचैतन्य सोहळा पार पडल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी गडावर फराळ वाटप करण्यात आले. शिवाय, कांदिवली येथील युवा मंचच्या सहकार्याने समितीने गडावरील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंची मदत करण्यात आली.गाजले ‘आम्ही मावळे’शिवचैतन्य सोहळा बोरीवली येथील ‘आम्ही मावळे’ ढोलताशा पथकाने अप्रतिम वादन करून गाजवला. ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक राजसदरेजवळ येताच नगारखानामध्ये आम्ही मावळे पथकाने आपल्या वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.आमची राज्य सरकारकडे विनंती आहे की, आज शिवरायांच्या नावाने राज्यकारभार होतो. राज्यातील प्रमुख किल्ले दिवाळीत अंधारात असतात. त्यामुळे सरकारने हा दीपोत्सव सरकारी इतमामात करावा, अशी आमची इच्छा आहे. महाराज त्यांचे कोणीच नाहीत का? आमचे कार्य त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते, पण सरकारनेही पुढाकार घ्यायला पाहिजे.- सुनील पवार, अध्यक्ष - श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती

टॅग्स :diwaliदिवाळी