शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

होऊन जाऊ दे, हलकल्लोळ !

By admin | Updated: August 1, 2015 00:33 IST

-कारण राजकारण

एका नेत्याच्या (म्हणजे इस्लामपूरकरांच्या) अतिमहत्त्वाकांक्षेनं जिल्ह्याच्या राजकारणाची वाट लागल्याचा घणाघात सोनसळकर साहेबांनी या आठवड्यात केला. अर्थात याला घणाघात म्हणायचं की, घंटीची किणकिण, हे जिल्ह्यानं ठरवावं! कारण अलीकडं सोनसळकर आणि इस्लामपूरकर या दोन्ही साहेबांमध्ये खरंच फाटलंय का, असा खवचट सवाल ऐकायला येतोय. एवढे दिवस हातात-हात (कुणाला दिसणार नाही, अशा बेतानं) घालून फिरणाऱ्या या दोघांना पुरेपूर ओळखणाऱ्यांच्या डोक्यात असा संशयाचा किडा वळवळणारच. या गंडवा-गंडवीचा पुरेपूर प्रत्यय प्रतीकदादांनी घेतलाय. आता जिल्हा बँकेपाठोपाठ बाजार समितीत मदनभाऊ आणि विशालदादा घेताहेत, अशी कुजबूज सुरू झालीय. कोणे एके काळी या दोघा साहेबांना मुख्यमंत्रीपदाची आस होती. ती लपून राहिलेली नव्हती. त्यात सोनसळकरांची जरा जास्त चर्चा झाली. आता सरकार गेल्यानं दोघांनी ‘आधी जिल्ह्याचं बघू’, म्हणून इथं लक्ष घातलंय. (तसं दोघांनाही आता काही काम राहिलेलं नाही म्हणा!) जिल्ह्यावर ‘कमांड’ ठेवण्यासाठी आणि वसंतदादा घराणं नेस्तनाबूत करण्यासाठी पंधरा वर्षं धडपडणाऱ्या इस्लामपूरकरांना आता कुठं यश येतंय, असं वाटत असतानाच सोनसळकर आडवे आलेत. सांगलीच्या बाजार समितीत तर शेट्टींचे राजूभाई, प्रतीकदादा, विशालदादा, महाडिक कंपनी, ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ गुऱ्हाळकर (त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून संपत नसल्यानं त्यांचं आडनाव ‘गुऱ्हाळकर’ ठेवलंय म्हणे!), मिरजेचे हाफिजभाई या नेहमीच्या यशवंत-गुणवंत कलाकारांसोबत आता अजितराव घोरपडे सरकार, सांगलीवाडीचे दिनकरतात्या, कवठेपिरानच्या हिंदकेसरींचे भीमराव आणि ‘जनसुराज्य’चे नारळवाले बसवराजही सोनसळकर साहेबांसोबत एकत्र आलेत. सरकार, तात्या आणि बसवराज कालपरवापर्यंत संजयकाका आणि जगताप साहेबांसोबत होते, पण पदरात काहीच पडेना झाल्यावर त्यांनी काडीमोड घेतला. नारळवाल्या बसवराजांना तर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद दिलं होतं. मुदत संपल्यावर त्यांनी दुगाण्या झाडल्या!तिकडं इस्लामपूरकर साहेबांनी खासदार संजयकाका आणि जतच्या जगताप साहेबांना हिकमतीनं जवळ ठेवलंय. (दोघं अजून इस्लामपूरकरांच्या ऋणातून मुक्त व्हायचेत ना!) शिवाय आबांचे मावळेही त्यांच्यामागं फरफटत जाताहेत. काही मावळ्यांनी इस्लामपूरकर साहेबांपुढं पांढरं निशाण फडकवलंय, तर काहींनी जाहीरपणे संजयकाकांचं ‘कमळ’ हातात घेतलंय. (काय करणार? राजकीय साठमारीत टिकायचं तर असं ‘शहाणपण’ दाखवायलाच हवं.) सांगली बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी इस्लामपूरकरांची जय्यत तयारी सुरू असली तरी तासगाव बाजार समितीत मात्र त्यांना काकांना अंगावर घ्यायची वेळ आली, पण इस्लामपूरकर कसले हुशार! त्यांनी पुन्हा चतुराईनं आबा-काका गटात झुंज लावून दिलीय. बसा लढत आणि डोकी फोडत! मणेराजुरी जिल्हा परिषद गटातला वचपा काकांनी जिल्हा बँकेत काढला, तो कुणाच्या इशाऱ्यावर? आबांचे मावळे एकमेकांची गचांडी धरू लागले, ते कुणाच्या उद्योगामुळं? हे ज्यांना कळलं, ते एकतर आबांचा गट सोडताहेत किंवा राजकारणाला रामराम तरी ठोकताहेत!काही का असेना, जिल्हाभरात दोन्ही साहेबांची जुंपलीय म्हणायचं. (किमान समजायचं तरी!) मागील वेळी जिल्हा बँकेत एकत्र असल्यानं सोनसळकर साहेबांनी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी शपथ घेतली होती. त्यामुळं बँकेतल्या अड्डेबाजीवर ते गप्प होते. बँक बरखास्त झाली, प्रशासक आला (तो सोनसळकरांनीच आणला, असं आता इस्लामपूरकर म्हणताहेत.) निवडणूक लागली, तेव्हा इस्लामपूरकरांच्या कंपूनं जिल्हा बँकेला राजकारणाचा अड्डा बनवल्याची तोफ डागून सोनसळकरांनी रान पेटवलं होतं. ते लक्षात ठेवून इस्लामपूरकरांनी आता बाजार समितीला राजकारणाचा अड्डा होऊ देणार नसल्याचं आधीच सांगून टाकलं! वा रे पठ्ठे! त्यावर मदनभाऊंकडून हिसकावून घेतलेल्या बाजार समितीत रात्री कुणाचा अड्डा भरायचा? तिथं काय-काय चालायचं? याची उत्तरं सोनसळकरांनी इस्लामपूरकरांकडं मागितलीत. एवढं सगळं सुरू असताना बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालासाठी आणि व्यापार टिकवून ठेवण्यासाठी काय करणार, हे कुणीच बोलत नाही. तिथल्या प्रश्नांवर मात्र सगळ्यांचीच अळीमिळी-गुपचिळी!जाता-जाता : ‘त्यांचे इंटरेस्ट वेगळे आणि आमचे वेगळे. माझंच मीठ कसं खोटं निघतं? मी ज्याला हाताला धरून मोठं करतो, तो माझ्यावरच कसा उलटतो?’ असा सवाल घोरपडे सरकारांनी (स्वत:लाच) केला आणि संजयकाकांच्या वर्मी घाव लागला. मग ‘आम्ही तोंड उघडलं तर तुमची अडचण होईल...’ अशा जहाल शब्दात संजयकाकांनी सरकारांना बजावलं. आता काकांनी तोंड उघडावंच! कारण काका-सरकारांचं शीतयुद्ध (लुटुपुटुचं की खरंखुरं?) चव्हाट्यावर आलंय. लोकसभेला निवडून आणल्यानंतरही सगळी मलई (पक्षी : लाभाची पदं) काकांनाच... आणि आम्ही काय नुसत्या टाळ्या वाजवायच्या काय, या प्रश्नातून तर सरकार, दिनकरतात्या आणि काकांचं फाटलं नसेल ना? सरकारांनी तेही सांगून टाकावं आणि काकांनीही तोंड उघडून सरकारांची अंडीपिल्ली बाहेर काढावीत... होऊन जाऊ दे, कमळाबाईच्या तंबूमध्ये हलकल्लोळ! --- श्रीनिवास नागे