शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष समितीच्या नेत्याला ‘मातोश्री’वर धमकावले , नारायण राणे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 05:10 IST

ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी कोकणातील शिवसेना नेते जमिनी संपादित करण्यासाठी लोकांवर दबाव आणत असून, संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी धमकावले

मुंबई : ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी कोकणातील शिवसेना नेते जमिनी संपादित करण्यासाठी लोकांवर दबाव आणत असून, संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी धमकावले, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद देला. कोकणी माणसांच्या वाटेला जाल तर फटके देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.कोकणात होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने आणला आहे. त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे दाद का मागत नाही? असा सवाल केला असता राणे म्हणाले, आपण मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. त्यांना भेटून प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार आहे, पण उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांनी या प्रकल्पाला होकार का कळविला? खा. विनायक राऊत, राजन साळवी या शिवसेना नेत्यांनी व दलालांनी कोकणात शेतकºयांना धमक्या देऊन जमिनी खरेदी करणे सुरू केले आहे, असा आरोप राणेंनी केला.ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील फळबागांचे आणि माशांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे कोकणी माणूस देशोधडीला लागण्याची भीती आहे. प्रकल्पाच्या परिसरात काही अधिकाºयांनी २०० एकर जमिनी घेतल्या आहेत. पोलीस अधिकारी दमदाटी करत आहेत, याची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत, असेही राणे यांनी सांगितले.वडिलांना माफी मागायला लावलीमातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला प्रकल्पाला विरोध करू नका, आमच्या नेत्यांविरुद्ध काही बोलू नका, असे सांगून माझ्या वडिलांना माफी मागायला लावली, असा आरोप विनेश वालम यांनी याच पत्रकार परिषदेत केला. माझ्या वडिलांना कोकणातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, तेथे एका अनोळखी डॉक्टराने त्यांना बळजबरीने इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. कशाचे इंजेक्शन आहे? असे विचारले असता, इंजेक्शन फेकून ते पळून गेले, असा आरोप वालम यांनी केला.सहनशीलता संपण्यापूर्वी निर्णय घ्यामाझी सहनशीलता संपण्याच्या आत मंत्रिपदाबाबत जो काय निर्णय घ्यायचा तो घ्या, असे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्या दृष्टीने काहीच हालचाल होताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनाच्या आधी त्यांचा समावेश केला जाईल, असे सांगितले गेले. आता डिसेंबरअखेरची तारीख निघाल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे