शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कोकण जलमय, प. महाराष्ट्रासह विदर्भातील नद्यांना आला पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 6:19 AM

कोकणात पावसाचे थैमान सुरू आहे. नदी, नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. राजापूरमध्ये पूर आला आहे

मुंबई : संततधार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला असून धरणांमध्ये समाधानकारक साठा होऊ लागला आहे. कोयना धरणात गत चोवीस तासांत पाच टीएमसी साठा वाढून ७२.८९ टीएमसी झाला आहे. पुण्यातील धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने उजनीत पाणी येत आहे. मराठवाड्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे भावली, दारणासह गंगापूर धरणातूनही विसर्ग सुरू असून गोदावरीचे पाणी जायकवाडीकडे झेपावू लागले आहे.

कोकणात पावसाचे थैमान सुरू आहे. नदी, नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. राजापूरमध्ये पूर आला आहे. चिपळूण, खेड जलमय झाले आहे. रत्नागिरी बाजारपेठेतही पाणीच पाणी होते. कोल्हापूरात पंचगंगेला पूर आला असून ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली किरवे दरम्यान पाणी भरल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.सांगली जिल्ह्यात संततधार कायम आहे. दुष्काळी तासगाव, कवठेमहांकाळ, जत, विटा, कडेगाव या तालुक्यातही पाऊस पडला आहे. कापूसखेड (ता. वाळवा) येथे पावसामुळे घराची भिंत कोसळून एक महिला ठार झाली आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, वेण्णा नद्या दुधडी वाहू लागल्या आहेत.

विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी सर्वदूर संततधार पाऊस आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांना पुराचा फटका बसला आहे. अमरावतीमध्ये धारणी तालुक्यात अतिवृष्टी झाली. वर्धा यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरात आजरा येथे ट्रक पलटी होऊन १०० सिलेंडर वाहून गेले. मुंबईत कळवा येथे दरड कोसळून दोघांचा तर लोणावळ््यात धबधब्यात पडून युवकाचा मृत्यू झाला.उस्मानाबादमध्ये संततधारमराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. नांदेडमधील किनवट तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टी झाली.परभणी जिल्ह्यात भीज पाऊस झाल्याने खरीप पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. नद्यांचे प्रवाह मात्र अनेक ठिकाणी कोरडेच आहेत.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ