शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे : प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक

By admin | Updated: October 8, 2014 23:02 IST

स्थानकप्रमुखांना घेराव-तब्बल ३२ तासानंतर कोकण रेल्वे मार्ग सुरु

रत्नागिरी : कोकण रेल्वेची सेवा ठप्प झालेली असताना दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने रत्नागिरीत बारा तास खोळंबलेल्या सावंतवाडी-दादर या रेल्वेतील प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकप्रमुखांना घेराव घालून एकच हंगामा केला. चिपळूणनजीक मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मंगळवारी सकाळपासून ठप्प आहे. मंगळवारी दिवसभरातील रेल्वे रद्द करण्यात आल्या किंवा त्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या. मंगळवारी रात्री सावंतवाडी-दादर ही रेल्वे रत्नागिरीत पाऊण वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. ही रेल्वे कणकवलीपासूनच उशिराने पुढे सरकत होती. एव्हाना चिपळूणला मालगाडीचे डबे घसरल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे ही रेल्वे मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत दाखल झाली. मात्र रात्री या रेल्वेतील वीजच गायब झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. वीज नसल्याने उष्णतेने हैराण झालेल्या अनेक प्रवाशांनी रेल्वेबाहेर येऊन रेल्वे स्थानकाचाच आसरा घेतला. काही वेळाने तर रेल्वेतील पाणीही संपले. त्यामुळे प्रवाशांची गोची झाली. याबाबत मध्यरात्रीच या प्रवाशांनी आपल्या व्यथा रेल्वे प्रशासनाकडे मांडल्या. मात्र त्यानंतर केवळ समजूत काढण्यापलिकडे प्रशासनाने काहीच केले नाही.बुधवारची सकाळ झाली, त्यानंतर पुन्हा या प्रवाशांनी रेल्वेच्या स्थानकप्रमुखांचे केबिन गाठले आणि त्यांना जाब विचारल्या. महिलांनीही आक्रमक होत स्थानकप्रमुखांना जाब विचारला. त्यावेळी संतप्त प्रवाशांची पुन्हा एकदा समजूत काढून स्थानकप्रमुखांनी सकाळी ११ वाजेपर्यंत रेल्वे सोडण्यात येईल, तोपर्यंत ट्रॅकचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.रेल्वे लवकरच सोडण्यात येईल, असे आश्वासन देऊन संबंधित स्थानकप्रमुखांनी आपली सोडवणूक करून घेतली. मात्र सकाळचे ११ वाजले तरीही रेल्वे सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी आणखीनच संतप्त झाले. त्यातच हजारोंच्या संख्येने असलेले प्रवासी पाहून व्यापाऱ्यांनीही आपल्या पदार्थांचे दर वाढवले. स्थानकावर केळी तर हंगाम नसतानाही ५० रूपये डझन या दराने विकली जात होती. त्यामुळे या प्रवाशांनी आपले पैसे परत करावेत, अशी मागणी केली. मात्र त्यावर रेल्वे अधिकारी निरूत्तर झाले.अखेरीस दुपारी ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाली आणि प्रवाशांनी निश्वास टाकला. सावंतवाडी ते रत्नागिरी यापलिकडे जाण्यास रेल्वेला १५ तास लागले. (प्रतिनिधी)प्रवासी वैतागले!चिपळूणनजीक मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मंगळवारी सकाळपासून ठप्प.मंगळवारी रात्री सावंतवाडी-दादर ही रेल्वे रत्नागिरीत पाऊण वाजण्याच्या सुमारास दाखल.रत्नागिरीत आल्यानंतर रेल्वेतील वीजच गायबथोड्यावेळाने रेल्वेतील पाणीही संपल्याने प्रवाशांचे हाल.अनेक प्रवाशांनी रेल्वेबाहेर येऊन रेल्वे स्थानकाचाच घेतला आसरा.थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रशासनाचा खटाटोप.संतप्त प्रवाशांनी केली पैसे परत देण्याची मागणी.हजारो प्रवाशांना महाग पदार्थांचाही बसला फटका.तब्बल ३२ तासानंतर कोकण रेल्वे मार्ग सुरुचिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणजवळील खेर्डी माळेवाडी येथे रुळ तुटल्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मालगाडीला अपघात झाला होता. ३२ तासानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असून या मार्गावरुन मुंबई मेंगलोर एक्स्प्रेस प्रथम धावली. कोकण रेल्वे मार्गावर रुळ तुटल्याने ११ डबे घसरले होते. रुळ उखडले होते. डब्यांची चाके निखळली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या अपघातानंतर कोकण रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हा मार्ग लवकर सुरु होईल की नाही अशी शंका होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने १५० कामगारांच्या मदतीने व क्रेनच्या सहाय्याने हे काम अल्प कालावधीत पूर्ण केले. त्यामुळे अखेरीस रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. तब्बल ३२ तासानंतर कोकण रेल्वेची ही सेवा सुरळीत सुरू झाली.रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या मार्गावर सायंकाळी ४ नंतर मुंबई मेंगलोर गाडी धावली. त्या पाठोपाठ राज्यराणी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, कोकणकन्या, जनशताब्दी या गाड्यांची ये-जा सुरु झाली आहे. या मार्गावरील संकट टळल्याने रेल्वे प्रवाशांना व रेल्वे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र आज बुधवारी सकाळी चिपळूण रेल्वेस्थानकात मुंबईहून आलेल्या मेंगलोर एक्स्पे्रसमधील प्रवाशांना सायंकाळपर्यंत ताटकळत रहावे लागले. या गाडीत पॅन्ट्रीकारची सोय नसल्याने वृद्ध, लहान मुले यांचे हाल झाले. (प्रतिनिधी)