शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

Keshav Upadhye:"बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली", भाजप नेत्याचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 20:47 IST

Keshav Upadhye on Uddhav Thackeray: "मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'हाता'साठी मतदान मागावं लागतं आहे."

मुंबई: आज राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि भाजप-सेना युतीच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांच्या या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

"बाळासाहेबांची शिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली"केशव उपाध्ये यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. "जे करतो उघडपणे करतो, लपून-छपून करत नाही. मग मुख्यमंत्री पदाबाबत बंद दाराआड चर्चा केली असा खोटा दावा कसा करू शकता? प्रचाराच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं भाजपाच्या सर्व नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते, तेव्हा गप्प होता. निकाल लागल्यानंतर जनतेशी विश्वासघात करुन मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली," असा घणाघात उपाध्ये यांनी केला.

"मुख्यमंत्रिपदासाठी ’हाता’पुढे टेकले हात"  ते पुढे म्हणाले, "आज हेच मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'हाता'साठी मतदान मागावं लागतंय, इतकी मुख्यमंत्रीपदाची हौस बरी‌ नव्हे. जे काम करतो मनापासून करतो, होय नक्कीच! गृहमंत्र्यांची महिन्याला 100 कोटींची वसुली, कोविड ‌काळात भ्रष्टाचार, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे, अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन भरलेली गाडी ठेवलेल्या अधिकाऱ्याची जाहीरपणे पाठराखण करणे, दाऊदसोबत जमिनीचा आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालणे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी विरोधकांना 'टोमणेबॉम्ब' मारणे. ही सगळी कामे मनापासून करता, ते जाहीर कबूल केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक वाटते," अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी केली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?"आम्ही कमी पडलो तरी चालेल, पण खोटं कधीच बोलणार नाही. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपवाले म्हणतात की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, पण आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने देशात एक बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. भाजपला खरचं हिंदुहृदयसम्राटांबद्दल प्रेम असेल, तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडला? नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचा नाव देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपच्या झेंड्यावरही अटलजी, अडवाणींचा फोटो नसतो. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातो, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही, " असा हल्लाबोल उद्दव ठाकरेंनी केला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना