शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Keshav Upadhye:"बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली", भाजप नेत्याचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 20:47 IST

Keshav Upadhye on Uddhav Thackeray: "मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'हाता'साठी मतदान मागावं लागतं आहे."

मुंबई: आज राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि भाजप-सेना युतीच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांच्या या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

"बाळासाहेबांची शिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली"केशव उपाध्ये यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. "जे करतो उघडपणे करतो, लपून-छपून करत नाही. मग मुख्यमंत्री पदाबाबत बंद दाराआड चर्चा केली असा खोटा दावा कसा करू शकता? प्रचाराच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं भाजपाच्या सर्व नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते, तेव्हा गप्प होता. निकाल लागल्यानंतर जनतेशी विश्वासघात करुन मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली," असा घणाघात उपाध्ये यांनी केला.

"मुख्यमंत्रिपदासाठी ’हाता’पुढे टेकले हात"  ते पुढे म्हणाले, "आज हेच मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'हाता'साठी मतदान मागावं लागतंय, इतकी मुख्यमंत्रीपदाची हौस बरी‌ नव्हे. जे काम करतो मनापासून करतो, होय नक्कीच! गृहमंत्र्यांची महिन्याला 100 कोटींची वसुली, कोविड ‌काळात भ्रष्टाचार, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे, अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन भरलेली गाडी ठेवलेल्या अधिकाऱ्याची जाहीरपणे पाठराखण करणे, दाऊदसोबत जमिनीचा आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालणे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी विरोधकांना 'टोमणेबॉम्ब' मारणे. ही सगळी कामे मनापासून करता, ते जाहीर कबूल केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक वाटते," अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी केली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?"आम्ही कमी पडलो तरी चालेल, पण खोटं कधीच बोलणार नाही. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपवाले म्हणतात की, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, पण आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने देशात एक बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. भाजपला खरचं हिंदुहृदयसम्राटांबद्दल प्रेम असेल, तर मग अमित शहांनी दिलेला शब्द का मोडला? नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचा नाव देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपच्या झेंड्यावरही अटलजी, अडवाणींचा फोटो नसतो. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातो, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही, " असा हल्लाबोल उद्दव ठाकरेंनी केला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना