मुंबई : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून साडेपाच कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्याच्या पन्नास टक्के म्हणजे अडीच कोटी मते मिळविण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.भाजपच्या सदस्यता अभियानाचा प्रारंभ मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील एक कोटी घरांत पक्षाचे सदस्य झाले पाहिजेत. भाजपच्या या पन्नास टक्के मतांच्या फॉर्मुल्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीचे काय होणार, याची काळजी कोणीही करण्याचे कारण नाही. जिथे आपल्याला गरज लागेल तिथे आपल्या भरवशावर आणि जिथे मित्राला गरज लागेल तिथे मित्रासाठी आपण काम करू, असेही ते म्हणाले.
विधानसभेला अडीच कोटी मतांचे लक्ष्य ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:19 IST
मुख्यमंत्री : भाजप कार्यकर्त्यांना केले आवाहन
विधानसभेला अडीच कोटी मतांचे लक्ष्य ठेवा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}