शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

छत्रपती शिवरायांनाही जिंकता आला नव्हता असा 'हा' अजिंक्य किल्ला; काय आहे यामागचं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 19:42 IST

Murud-Janjira Killa : भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता.

मुंबई - छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील अनेक गडकोट किल्ले स्वराज्यात जिंकलेले आपण ऐकलं आहे. मात्र एक असा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर संभाजी महाराज, ब्रिटीश, मुघल, पोर्तुगीज कोणालाच जिंकता आला नाही. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड किनारपट्टी गावात आहे, जो मुरुड जंजिरा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ९० फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या चहूबाजूला अरबी समुद्राने वेढलं आहे. 

मुरुड जंजिरा हा किल्ला समुद्राच्या लाटांमध्ये भक्कमपणे उभं राहून अनेक आक्रमणांना सामोरं गेला आहे. या किल्ल्याबाबत अनेक रहस्य आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा एकमेव किल्ला आहे जो कधीही जिंकता आला नाही. हा किल्ला जिंकण्यासाठी ब्रिटीश, पोर्तुगीज, मुघल, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, चिमाजी आप्पा आणि संभाजी महाराज यांनी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे हा जंजिरा किल्ला नेहमी अंजिक्य राहिला.

मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या काही मीटर अंतरावर गेल्यावरच दिसू शकतो अशाप्रकारे बांधण्यात आला आहे. त्यामुळे शत्रूला या किल्ल्यात प्रवेश करणं आव्हानात्मक असायचे.  

१५ व्या शतकात अहमदनगरच्या सल्तनीत मलिक अंबरच्या देखरेखीमध्ये किल्ल्याचं बांधकाम झालं. मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. त्याची तटबंदी ४० फुट उंच आहे व किल्ला बावीस एकर जमिनीवर पसरला आहे. किल्ल्याचे बुरुज गोलाकार असून अजूनही बुलंद स्थितीत आहेत. हा किल्ला पंच पीर पंजतन शाह बाबांच्या संरक्षणाखाली असल्याचे मानले जाते. शाह बाबांची थडगीही या किल्ल्यात आहे.

भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. आजही अनेक तोफा किल्ल्यावर आढळून येतात. १६६९ मध्ये स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याची मोहिम आखली होती. मात्र हा किल्ला राजांना जिंकता आला नाही. असा हा अजिंक्य किल्ला ३ एप्रिल, १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाला. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडFortगड