शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
2
₹6700000 चं टॉयलेट, ₹76000 चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
3
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
4
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
5
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
6
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
7
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
8
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
9
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
10
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
11
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
12
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
13
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
14
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
15
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
16
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
17
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
18
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
19
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
20
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांनाही जिंकता आला नव्हता असा 'हा' अजिंक्य किल्ला; काय आहे यामागचं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 19:42 IST

Murud-Janjira Killa : भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता.

मुंबई - छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील अनेक गडकोट किल्ले स्वराज्यात जिंकलेले आपण ऐकलं आहे. मात्र एक असा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर संभाजी महाराज, ब्रिटीश, मुघल, पोर्तुगीज कोणालाच जिंकता आला नाही. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड किनारपट्टी गावात आहे, जो मुरुड जंजिरा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ९० फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या चहूबाजूला अरबी समुद्राने वेढलं आहे. 

मुरुड जंजिरा हा किल्ला समुद्राच्या लाटांमध्ये भक्कमपणे उभं राहून अनेक आक्रमणांना सामोरं गेला आहे. या किल्ल्याबाबत अनेक रहस्य आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा एकमेव किल्ला आहे जो कधीही जिंकता आला नाही. हा किल्ला जिंकण्यासाठी ब्रिटीश, पोर्तुगीज, मुघल, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, चिमाजी आप्पा आणि संभाजी महाराज यांनी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना यश आलं नाही. त्यामुळे हा जंजिरा किल्ला नेहमी अंजिक्य राहिला.

मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या काही मीटर अंतरावर गेल्यावरच दिसू शकतो अशाप्रकारे बांधण्यात आला आहे. त्यामुळे शत्रूला या किल्ल्यात प्रवेश करणं आव्हानात्मक असायचे.  

१५ व्या शतकात अहमदनगरच्या सल्तनीत मलिक अंबरच्या देखरेखीमध्ये किल्ल्याचं बांधकाम झालं. मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. त्याची तटबंदी ४० फुट उंच आहे व किल्ला बावीस एकर जमिनीवर पसरला आहे. किल्ल्याचे बुरुज गोलाकार असून अजूनही बुलंद स्थितीत आहेत. हा किल्ला पंच पीर पंजतन शाह बाबांच्या संरक्षणाखाली असल्याचे मानले जाते. शाह बाबांची थडगीही या किल्ल्यात आहे.

भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. आजही अनेक तोफा किल्ल्यावर आढळून येतात. १६६९ मध्ये स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याची मोहिम आखली होती. मात्र हा किल्ला राजांना जिंकता आला नाही. असा हा अजिंक्य किल्ला ३ एप्रिल, १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाला. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडFortगड