शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रिअल्टी, सोन्याची चमक कायम

By admin | Updated: June 5, 2014 00:35 IST

जगातील जवळपास सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना भारतात गेल्या पाच वर्षामध्ये स्थावर मालमत्ता आणि सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.

नवी दिल्ली : जगातील जवळपास सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना भारतात गेल्या पाच वर्षामध्ये स्थावर मालमत्ता आणि सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे या दोन क्षेत्रंमध्ये चमक दिसत असली तरी कंपन्यांमधील गुंतवणूक घटत असल्यामुळे त्यांच्या भागभांडवलामध्ये घट झालेली दिसून येत आहे.
केंद्रीय सांख्यिकी संघटन (सीएसओ)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन 2क्क्8 पासून जगभरातील अनेक अर्थव्यवस्था या मंदीचा सामना करीत असताना याच काळात भारतामध्ये मात्र सोने आणि स्थावर मालमत्तेची खरेदी मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे दिसून आले आहे. मात्र याच कालावधीत कंपन्यांमधील गुंतवणूक कमी झाल्यामुळे कंपन्यांचे भागभांडवल कमी होत असल्याचेही दिसून आले आहे.
 भारतीय नागरिकांचे सोन्याबाबतचे प्रेम हे सर्वज्ञात आहे. लगAसमारंभ, विविध सण आणि समारंभासाठी तसेच गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी केली जाते. त्याचप्रमाणो स्थावर मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक ही कायमस्वरूपी वाढीव लाभ देणारी असते, असाही एक मतप्रवाह असून त्यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
15 सप्टेंबर, 2क्क्8 रोजी अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाची बॅँक असलेल्या लेहमन ब्रदर्सची दिवाळखोरी जाहीर झाली आणि त्यानंतर जगावर आर्थिक मंदीचे सावट आले. सन 2क्क्8 मध्ये भारतातील खासगी कंपन्यांमधील भांडवल हे देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 18.8 टक्के असे सर्वाधिक होते. सन 2क्13 मध्ये ते एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 9.9 टक्क्यांर्पयत खाली आले आहे. यामुळे देशातील कंपन्यांना खेळत्या भांडवलाची कमतरता जाणवत असून त्यांची उत्पादनक्षमता कमी झाल्याचे दिसून येत आहे.
लेहमन संकट आले तेव्हा भारताची सोने आणि स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक 48 टक्के होती. त्यानंतर त्यामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते. यावेळी भारतीयांची बचत, म्युच्युअल फंडस्, शेअर बाजार अशा सर्व प्रकारांतील गुंतवणूक 52 टक्के होती ती आता 32.4 टक्क्यांर्पयत घसरली आहे.
सन 2क्क्8 ते 2क्13 या काळात कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली तसेच मागणी घटल्याने मालाला फारसा उठाव राहिलेला नसल्याने कंपन्यांच्या नफ्यात घट होताना दिसत आहे. या कालावधीत मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या बॅँक आणि वित्तीय कंपन्या वगळता 2क्क् कंपन्यांच्या सरासरी नफ्यात घट होत आहे. 2क्क्8 मध्ये सरासरी नफा 19.8 टक्क्यांवरून आता 15.6 टक्क्यांर्पयत खाली आला आहे. त्याचा फटका कंपन्यांमधील गुंतवणूक कमी होण्यात झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
गेल्या पाच वर्षामध्ये शहरी भागातील नागरिकांपेक्षा ग्रामीण नागरिकांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीचा दर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.
खाद्यपदार्थाच्या वाढीव किमती, शेतजमिनीला मिळत असलेला अधिक दर, शेतमालाच्या घाऊक मूल्यात झालेली वाढ, ग्रामीण भागात सुरू असलेले रोजगार हमी कार्यक्रम, तसेच रस्ता निर्मिती यामुळे या भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढताना दिसत आहे.
 
आकाशाला भिडणारी महागाई आणि आर्थिक मंदी यामुळे पगारदार शहरी नागरिकांच्या उत्पन्नामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये फारशी वाढ झालेली दिसत नाही.
4यामुळे शहरी पगारदारांना या काळात गुंतवणुकीला फारसा वाव मिळालेला नाही. या व्यक्ती आपले उत्पन्न वाढविण्यासाठी कोणते विविध मार्ग अवलंबता येतील याचाच शोध घेताना दिसून येत आहेत.