शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषा हरवली तर भविष्य हरवेल - नेमाडे

By admin | Updated: August 14, 2015 11:43 IST

मातृभाषा ही आपल्या ओळखीपुरती असते आणि मातृभाषा हरवली की तुमचे भविष्य हरवते. तेव्हा आपली मातृभाषा जपणे गरजेचे आहे, असे भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे.

 मुंबई : मातृभाषा ही आपल्या ओळखीपुरती असते आणि मातृभाषा हरवली की तुमचे भविष्य हरवते. तेव्हा आपली मातृभाषा जपणे गरजेचे आहे, असे उद्गार ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी काढले.मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्रातर्फे आयोजित राजीव गांधी व्याख्यानांतर्गत 'साहित्य आणि समाज' या विषयावर भालचंद्र नेमाडे बोलत होते. ते म्हणाले, आपण साहित्याकडे वेळ घालविण्याचे साधन म्हणून पाहतो. आपल्याकडची पद्धत एककेंद्री असल्याने वतरुळाच्या परिघावरील लोकांचा समाज विचारच करत नाही. आपण जुन्या गोष्टी, रुढी-परंपरा, पद्धती कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी त्या बदलत नाहीत. तेव्हा लेखकांनी त्यात पडूच नये, असा सल्लाही त्यांनी लेखकांना दिला.आपले लिखित साहित्य शुद्र ठरेल इतके आपले मौखिक साहित्य समृद्ध आहे. आपल्याकडे लोकगीते, तमाशे, वग असे मौखिक साहित्य लिखित साहित्याला मागे टाकेल, असेही नेमाडे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. दरम्यान, 'हिंदू' कादंबरीचा दुसरा भागही लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती व्याख्यानादरम्यान देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, संस्कृत विभागप्रमुख डॉ. गौरी माहुलीकर, मराठी विभागप्रमुख डॉ. भारती निरगुडकर आणि केंद्राचे डॉ. चंद्रकात पुरी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)