शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी आणखी किती बळी ?

By admin | Updated: August 18, 2014 22:38 IST

कंपनी आणि केंद्र शासनाच्या वादात अडकले महामार्ग विस्तारीकरण

अकोला : पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. आणखी सहा निष्पाप जीवांना प्राणास मुकावे लागले. अरुंद रस्ता आणि महामार्गाची झालेली दुरवस्था यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असतानाही केवळ वाढीव निधीच्या मुद्यावर महामार्गाचे विस्तारीकण रखडले आहे. मंगळवारच्या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा चौपदरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून आणखी किती बळी घेतल्यानंतर केंद्र शासन आणि कंपनीच्या अधिकार्‍यांचे डोळे उघडतील, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून उपस्थित होत आहे. पश्‍चिम विदर्भाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे अमरावती ते जळगावपर्यंतच्या २७५.२५ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

जमीन हस्तांतरण आणि पर्यावरण विभागाची मान्यता या अडचणी केव्हाच दूर झाल्या आहेत. हे कंत्राट एल अँण्ड टी इन्फ्रास्ट्रर डेव्हलपमेंट प्रोजेक्टस् लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. ३0 महिन्यांच्या अवधीमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या अटीवर निविदा स्वीकृती करण्यात आली होती. प्रत्यक्षात हे काम दोन वर्षांपूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. असे असतानाही अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली नाही. या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यास वाहतूक व विकासाला चालना मिळणार आहे. करारनाम्यानुसार काम सुरू करण्यास विलंब झाल्याने, कंपनीने दरवाढ व ह्यआयडामिंग कॉस्टह्णच्या भरपाईची मागणी आणि प्रीमियमची पुनर्रचना करून, १0 टक्के दराची सवलत मागितली आहे; परंतु सवलतदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यादरम्यान कोणताही तोडगा निघाला नसल्याने, या महामार्गाचे काम रखडले आहे.

कंपनी आणि केंद्र शासनाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यापैकी कुणीही तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने २७५ किलोमीटर अंतरावर महामार्गाच्या लगत असलेल्या गावांमधील ग्रामस्थांना जीव मुठीत धरूनच जगावे लागत आहे. रस्ता ओलांडताना कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याचा नेम नसल्याने या मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.