शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सुट्ट्यांच्या मोसमात शाळेत कसा राबवायचा स्वछता पंधरवडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:31 IST

मुख्याध्यापक, शिक्षकांसमोर प्रश्न; शिक्षण विभागाचा कारभार ढिसाळ असल्याचा आरोप

मुंबई : गणेशोत्सव, मोहरम व शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन आणि नियोजन नेमके कसे करावे, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन आणि मुखाध्यापक, शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १ ते १५ सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. मात्र, या संदर्भातील सूचना शाळांना ३० आॅगस्ट रोजी पोहोचली असून, पुढील आठवड्यात सुट्ट्यांचा मोसम असल्याने उपक्रम राबविण्याबाबत शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर प्रश्नचिन्ह आहे.

राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छता पंधरवड्याच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात येईल. शाळा, शाळांचा परिसर आणि घरांमध्ये स्वच्छता व स्वच्छतेचे महत्त्व याबाबत जागृती करून, स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवड्याला विरोध नाही, पण या संदर्भातील ढिसाळ नियोजनाला विरोध असल्याची नाराजी शिक्षक व मुखाध्यापकांत आहे.

१ सप्टेंबर रविवार व २ सप्टेंबरला महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. अनेक शैक्षणिक संस्थांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मोहरम व अनंत चतुर्दशीला सुट्टी आहे. स्वच्छता अभियान राबविणे आवश्यकच आहे, परंतु नियोजन करताना अपुरा अवधी का? शिक्षण विभागाकडून असे परिपत्रक उशिरा का काढण्या येते? परिपत्रक काढताना स्थानिक सण, उत्सव या गोष्टींचा विचारही करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली.शाळांसाठी काय आहेत सूचना?च्सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी या पंधरवड्यातील पहिल्याच आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ किंवा पालक आणि शिक्षकांमध्ये या उद्देशासाठी बैठका आयोजित करणे अपेक्षित आहे.च्शिक्षकांनी शाळांतील, शैक्षणिक संस्थांमधील स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास अशा सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रस्ताव योजना तयार करावी, तसेच या विषयावर विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, असे शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या निर्णयात नमूद आहे. शाळा व शिक्षण संस्थांमध्ये या पंधरवड्यात राबविण्यात आलेले विविध उपक्रम दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावेत, असे शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

मोडके फर्निचर, जुन्या फायली फेकाच्अनेक शाळा व शैक्षणिक संस्थांच्या संकुलात अडगळ ठरत असलेल्या जुन्या अभिलेखांची नोंदणी करून अनावश्यक असलेली कागदपत्रे काढून टाकावीत. नियमानुसार जुन्या फायलींचे दप्तरही कमी करण्याचा प्रयत्न करावा अथवा गरज नसेल तर निष्कासित करावे, शाळा अथवा शाळेच्या आवारात, शैक्षणिक संस्थेतील सर्व टाकाऊ सामान निष्कासित करावे.च्मोडके फर्निचर, निरुपयोगी उपकरणे आणि नादुरुस्त वाहने नियमानुसार मोडीत काढावीत, ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी जागृती निर्माण करण्याचे कामही या पंधरवड्यात करावे, असे सांगण्यात आले आहे.