शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

सुट्ट्यांच्या मोसमात शाळेत कसा राबवायचा स्वछता पंधरवडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:31 IST

मुख्याध्यापक, शिक्षकांसमोर प्रश्न; शिक्षण विभागाचा कारभार ढिसाळ असल्याचा आरोप

मुंबई : गणेशोत्सव, मोहरम व शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन आणि नियोजन नेमके कसे करावे, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन आणि मुखाध्यापक, शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १ ते १५ सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. मात्र, या संदर्भातील सूचना शाळांना ३० आॅगस्ट रोजी पोहोचली असून, पुढील आठवड्यात सुट्ट्यांचा मोसम असल्याने उपक्रम राबविण्याबाबत शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर प्रश्नचिन्ह आहे.

राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छता पंधरवड्याच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात येईल. शाळा, शाळांचा परिसर आणि घरांमध्ये स्वच्छता व स्वच्छतेचे महत्त्व याबाबत जागृती करून, स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवड्याला विरोध नाही, पण या संदर्भातील ढिसाळ नियोजनाला विरोध असल्याची नाराजी शिक्षक व मुखाध्यापकांत आहे.

१ सप्टेंबर रविवार व २ सप्टेंबरला महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. अनेक शैक्षणिक संस्थांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मोहरम व अनंत चतुर्दशीला सुट्टी आहे. स्वच्छता अभियान राबविणे आवश्यकच आहे, परंतु नियोजन करताना अपुरा अवधी का? शिक्षण विभागाकडून असे परिपत्रक उशिरा का काढण्या येते? परिपत्रक काढताना स्थानिक सण, उत्सव या गोष्टींचा विचारही करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली.शाळांसाठी काय आहेत सूचना?च्सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी या पंधरवड्यातील पहिल्याच आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ किंवा पालक आणि शिक्षकांमध्ये या उद्देशासाठी बैठका आयोजित करणे अपेक्षित आहे.च्शिक्षकांनी शाळांतील, शैक्षणिक संस्थांमधील स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास अशा सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रस्ताव योजना तयार करावी, तसेच या विषयावर विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, असे शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या निर्णयात नमूद आहे. शाळा व शिक्षण संस्थांमध्ये या पंधरवड्यात राबविण्यात आलेले विविध उपक्रम दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावेत, असे शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

मोडके फर्निचर, जुन्या फायली फेकाच्अनेक शाळा व शैक्षणिक संस्थांच्या संकुलात अडगळ ठरत असलेल्या जुन्या अभिलेखांची नोंदणी करून अनावश्यक असलेली कागदपत्रे काढून टाकावीत. नियमानुसार जुन्या फायलींचे दप्तरही कमी करण्याचा प्रयत्न करावा अथवा गरज नसेल तर निष्कासित करावे, शाळा अथवा शाळेच्या आवारात, शैक्षणिक संस्थेतील सर्व टाकाऊ सामान निष्कासित करावे.च्मोडके फर्निचर, निरुपयोगी उपकरणे आणि नादुरुस्त वाहने नियमानुसार मोडीत काढावीत, ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी जागृती निर्माण करण्याचे कामही या पंधरवड्यात करावे, असे सांगण्यात आले आहे.