शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
3
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
4
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
5
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
6
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
7
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
8
Nashik Municipal Election 2026: एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन
9
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
10
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
11
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
12
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
13
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
14
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
15
Mumbai Crime: डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
16
Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
17
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
18
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
19
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
20
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Daily Top 2Weekly Top 5

आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:43 IST

वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय असं उल्लेख करत आपले नम्र राज ठाकरे-उद्धव ठाकरे असं पत्रकावर छापण्यात आले आहे.

मुंबई - राज्यात पहिलीच्या वर्गापासून हिंदी सक्तीविरोधात मराठी भाषा प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. त्यात ठाकरे बंधूंनी एकत्रित येत सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चाची हाक दिली होती. येत्या ५ जुलैला हा मोर्चा होणार होता परंतु त्याआधीच हिंदीबाबत सरकारकडून काढलेले दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे मोर्चा आधीच सरकारने घेतलेला निर्णय हा मराठी माणसांचा विजय असल्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मात्र ५ जुलैला मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्याचं या दोन्ही पक्षांनी ठरवले.

वरळी डोम येथे ५ जुलैला ठाकरे बंधू यांच्या नेतृत्वात मराठी भाषिकांचा विजयी मेळावा घेतला जाणार आहे. त्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित आवाहन केलेले पत्रक खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले. या पत्रकात म्हटलंय की, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का, तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे..वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय असं उल्लेख करत आपले नम्र राज ठाकरे-उद्धव ठाकरे असं पत्रकावर छापण्यात आले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

विजयी मेळाव्याबाबत संजय राऊत म्हणाले की, माझं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर वरळी येथे डोम सभागृहात हा मेळावा करावा असं ठरले. हा विजयी मेळावा शिवतीर्थावर व्हावा यासाठी आम्ही अर्ज दिला होता. अनिल परब त्यासाठी प्रयत्न करतायेत. परंतु हे सरकार आम्हाला ती परवानगी देणार नाही हे माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय दिला तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारला. या मेळाव्याबाबत आमची बैठकही झाली. कार्यक्रमाचे स्वरूप काय असावे, किती माणसे येतील यावर प्राथमिक चर्चा केली. ५ जुलैला साधारण १२ ते १२.३० च्या सुमारास हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे-राज ठाकरे उपस्थित असतील. ठाकरे एकत्र दिसतील याबाबत शंका आणि दुमत असण्याचे कारण नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय या लढ्यात जे सहभागी झाले मग ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते असतील, डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. महाराष्ट्राची एकजूट ही राजकीय मतभेद, पक्षांच्या पलीकडे आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्याच्या आधारे, सत्तेचा वापर करत हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उसळून उभा राहिला हेच आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखवून द्यायचे आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा