शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 05:25 IST

'आता कोणताही फॅक्टर  चालणार नाही. महायुती सरकारने लोकांच्या हिताच्या अनेक योजनांची  प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे', असेही गोयल जरांगे फॅक्टर बद्दल बोलताना म्हणाले.

मुंबई : धर्म, जात आणि भाषेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील जनतेत फूट घडवून आणत  आहे. त्यांचा तो एकमेव कार्यक्रम असून, त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत. काँग्रेसच्या या नीतीला उत्तर देण्यासाठी आणि  देश एकसंघ राखण्याच्या हेतूनेच  आम्ही ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा देत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय  मंत्री पीयूष गोयल यांनी ‘लोकमत’ला  दिलेल्या मुलाखतीत  केले. यावेळी त्यांनी बटेंगे तो कटेंगे, जरांगे फॅक्टर, मुस्लिम आरक्षण आदी मुद्द्यांवर सविस्तर विवेचन केले. लोकसभेला काँग्रेसने ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता जनता सावध झाली आहे. मी गेले काही दिवस राज्याचा दौरा करीत असून, जनता महायुतीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट चित्र आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. मुंबईत आम्ही दणदणीत जागा जिंकणार आहोत. महाविनाश आघाडीचा पराभव अटळ आहे, असे ते म्हणाले. 

उलेमांच्या शिष्टमंडळाला   काँग्रेसने मुस्लिम  आरक्षणाबाबत लेखी आश्वासन दिले आहे. दलित, ओबीसी यांचे आरक्षण कापून मुस्लिमांना  १० टक्के आरक्षण देण्याचे काँग्रेसचे व्होट  बँकेचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का तसेच बाळासाहेब  ठाकरे, स्वातंत्र्यवीर  सावरकर यांचे कौतुक करण्याचे धाडस   राहुल गांधी  दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला. 

काँग्रेस पक्ष तुटत चालला आहे. उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत. या निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक असतील. काँग्रेससोबत  जाण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद करेन, अशी बाळासाहेबांची ठाम भूमिका होती. उद्धव यांना मात्र या भूमिकेचा विसर पडल्याची टीका गोयल यांनी यावेळी केली. 

जरांगे फॅक्टरचा भाजप-महायुतीला फटका बसेल का?

जरांगे फॅक्टरचा भाजपला  किंबहुना महायुतीला किती फटका बसेल, असे विचारले असता, आता कोणताही फॅक्टर  चालणार नाही. महायुती सरकारने लोकांच्या हिताच्या अनेक योजनांची  प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती जनतेला भावली आहे. त्यामुळे महायुती आघाडीलाच लोक पुन्हा सत्तेवर बसवणार असून, महाराष्ट्र बरबाद करण्याचा उद्योग करणाऱ्या  महाविनाश आघाडीला  लोक निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देतील,    असे ते ठामपणे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेतील, असेही त्यांनी स्पष्ट  केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकMahayutiमहायुतीpiyush goyalपीयुष गोयलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी