शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 05:25 IST

'आता कोणताही फॅक्टर  चालणार नाही. महायुती सरकारने लोकांच्या हिताच्या अनेक योजनांची  प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे', असेही गोयल जरांगे फॅक्टर बद्दल बोलताना म्हणाले.

मुंबई : धर्म, जात आणि भाषेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील जनतेत फूट घडवून आणत  आहे. त्यांचा तो एकमेव कार्यक्रम असून, त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत. काँग्रेसच्या या नीतीला उत्तर देण्यासाठी आणि  देश एकसंघ राखण्याच्या हेतूनेच  आम्ही ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा देत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय  मंत्री पीयूष गोयल यांनी ‘लोकमत’ला  दिलेल्या मुलाखतीत  केले. यावेळी त्यांनी बटेंगे तो कटेंगे, जरांगे फॅक्टर, मुस्लिम आरक्षण आदी मुद्द्यांवर सविस्तर विवेचन केले. लोकसभेला काँग्रेसने ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता जनता सावध झाली आहे. मी गेले काही दिवस राज्याचा दौरा करीत असून, जनता महायुतीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट चित्र आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. मुंबईत आम्ही दणदणीत जागा जिंकणार आहोत. महाविनाश आघाडीचा पराभव अटळ आहे, असे ते म्हणाले. 

उलेमांच्या शिष्टमंडळाला   काँग्रेसने मुस्लिम  आरक्षणाबाबत लेखी आश्वासन दिले आहे. दलित, ओबीसी यांचे आरक्षण कापून मुस्लिमांना  १० टक्के आरक्षण देण्याचे काँग्रेसचे व्होट  बँकेचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का तसेच बाळासाहेब  ठाकरे, स्वातंत्र्यवीर  सावरकर यांचे कौतुक करण्याचे धाडस   राहुल गांधी  दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला. 

काँग्रेस पक्ष तुटत चालला आहे. उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत. या निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक असतील. काँग्रेससोबत  जाण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद करेन, अशी बाळासाहेबांची ठाम भूमिका होती. उद्धव यांना मात्र या भूमिकेचा विसर पडल्याची टीका गोयल यांनी यावेळी केली. 

जरांगे फॅक्टरचा भाजप-महायुतीला फटका बसेल का?

जरांगे फॅक्टरचा भाजपला  किंबहुना महायुतीला किती फटका बसेल, असे विचारले असता, आता कोणताही फॅक्टर  चालणार नाही. महायुती सरकारने लोकांच्या हिताच्या अनेक योजनांची  प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती जनतेला भावली आहे. त्यामुळे महायुती आघाडीलाच लोक पुन्हा सत्तेवर बसवणार असून, महाराष्ट्र बरबाद करण्याचा उद्योग करणाऱ्या  महाविनाश आघाडीला  लोक निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देतील,    असे ते ठामपणे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेतील, असेही त्यांनी स्पष्ट  केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकMahayutiमहायुतीpiyush goyalपीयुष गोयलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी