शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाचे पुन:श्च हरिओम, विदर्भात मुसळधार; कोकण, मराठवाड्यातही बरसल्या सरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 06:22 IST

मुंबई, कोकणासह विदर्भात सर्वदूर पाऊस पडला, तर मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

मुंबई/नागपूर : पंधरा दिवसांपेक्षाही जास्त दिवस ओढ दिलेल्या पावसाने अखेर राज्यात दमदार  ‘पुन:श्च हरिओम’ केले आहे. मुंबई, कोकणासहविदर्भात सर्वदूर पाऊस पडला, तर मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. आणखी पाऊस आला, तर दुबार पेरणीचे संकट टळणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. दिवसभरात तब्बल ९९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पेंच नवेगाव खैरी धरण पूर्णपणे भरले. त्यामुळे या धरणाचे गेट उघडावे लागले. गडचिरोली, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. अमरावतीतही दमदार पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने कमबॅक केले. या पावसामुळे भातासह इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात नदीवरील पूल ओलांडून जाण्याचा प्रयत्न करणारे दोन जण वाहून गेले. 

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणक्षेत्रातही पावसाचा जोर होता. मराठवाडा  : परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. अहमदनगर शहरासह श्रीगोंदा, जामखेड, अकोले तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

येत्या २४ तासात मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार तर, काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १० जुलैपासून राज्यातील पाऊसमान वाढण्याची चिन्हे आहेत. येत्या १० ते १२ जुलैदरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला. १२ जुलैला कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्यात ‘ऑरेंट अलर्ट’ दिला असून घाट विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनसाठीचे हवामान अनुकूल झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि हवेच्या वरील स्तरात अनुकूल असलेले हवामान यामुळे महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसांत चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.    - शुभांगी भुते, शास्त्रज्ञ,     मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग   

टॅग्स :RainपाऊसkonkanकोकणMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ