शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 07:09 IST

Devendra Fadnavis News: बचत गट वा अन्य मार्गांनी  कर्ज घेणाऱ्या महिला  १०० टक्के परतफेड करतात, त्या तुलनेने पुरुष परतफेड करत नाहीत, असे सांगून महिला सेवा सहकारी संस्थांना यापुढे सरकारच्या माध्यमातून होणारी कामे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. 

मुंबई - बचत गट वा अन्य मार्गांनी  कर्ज घेणाऱ्या महिला  १०० टक्के परतफेड करतात, त्या तुलनेने पुरुष परतफेड करत नाहीत, असे सांगून महिला सेवा सहकारी संस्थांना यापुढे सरकारच्या माध्यमातून होणारी कामे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

प्रदेश भाजप महिला आघाडीच्या वतीने आ. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात राज्यभरातील ३६ लाख ७८ हजार भगिनींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या राख्या प्रदान करण्याचा कार्यक्रम येथे झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा मंत्री आशिष शेलार यांचीही यावेळी भाषणे झाली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. मंदा म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते.

भगिनींनी दिलेल्या प्रेमातून मी  कधीही उतराई होणार नाही. समाजात ५० टक्के असलेल्या महिलांचा सहभाग आणि विकासाशिवाय देश मजबूत होणे शक्य नाही. महिलांसाठी सुरू असलेल्या सरकारच्या योजनांपैकी एकही बंद केली जाणार नाही. महिलांची प्रगती आता कोणीही थांबवू शकणार नाही. २०२९ मध्ये त्यांचा लोकसभा आणि विधानसभेतही मोठा सहभाग असेल, तेव्हा देश आणि राज्य हे महिलांच्या हुकुमाने चालेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

योजना लवकरच सुरू होणार राज्यात तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली असून या संस्थांच्या फेडरेशनची नोंदणीही झाली आहे. आ. चित्रा वाघ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा संदर्भ देऊन फडणवीस यांनी या संस्थांना सरकारची विविध कामे/कंत्राटे दिली जातील असे सांगितले. लवकरच ही योजना सुरू होणार आहे. 

‘बिहारमध्ये जातात अन् तिथे महाराष्ट्राची बदनामी करतात’पंतप्रधान मोदी नेहमीच सांगतात आणि ही वस्तुस्थिती आहे की महिलांनी आम्हाला नेहमीच मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. मात्र, काहीजण व्होटचोरीचा आरोप करतात. व्होटचोरी नाही त्यांचे डोके चोरी झाले आहे.

आता ते बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. लाडक्या बहिणींच्या मतांना ते चोरी म्हणतात, खरे चोर तर असा आरोप करणारेच आहेत, त्यांच्या डोक्यात थोडी अक्कल येवो,  असा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र