शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 07:09 IST

Devendra Fadnavis News: बचत गट वा अन्य मार्गांनी  कर्ज घेणाऱ्या महिला  १०० टक्के परतफेड करतात, त्या तुलनेने पुरुष परतफेड करत नाहीत, असे सांगून महिला सेवा सहकारी संस्थांना यापुढे सरकारच्या माध्यमातून होणारी कामे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. 

मुंबई - बचत गट वा अन्य मार्गांनी  कर्ज घेणाऱ्या महिला  १०० टक्के परतफेड करतात, त्या तुलनेने पुरुष परतफेड करत नाहीत, असे सांगून महिला सेवा सहकारी संस्थांना यापुढे सरकारच्या माध्यमातून होणारी कामे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

प्रदेश भाजप महिला आघाडीच्या वतीने आ. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात राज्यभरातील ३६ लाख ७८ हजार भगिनींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या राख्या प्रदान करण्याचा कार्यक्रम येथे झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा मंत्री आशिष शेलार यांचीही यावेळी भाषणे झाली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. मंदा म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते.

भगिनींनी दिलेल्या प्रेमातून मी  कधीही उतराई होणार नाही. समाजात ५० टक्के असलेल्या महिलांचा सहभाग आणि विकासाशिवाय देश मजबूत होणे शक्य नाही. महिलांसाठी सुरू असलेल्या सरकारच्या योजनांपैकी एकही बंद केली जाणार नाही. महिलांची प्रगती आता कोणीही थांबवू शकणार नाही. २०२९ मध्ये त्यांचा लोकसभा आणि विधानसभेतही मोठा सहभाग असेल, तेव्हा देश आणि राज्य हे महिलांच्या हुकुमाने चालेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

योजना लवकरच सुरू होणार राज्यात तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली असून या संस्थांच्या फेडरेशनची नोंदणीही झाली आहे. आ. चित्रा वाघ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा संदर्भ देऊन फडणवीस यांनी या संस्थांना सरकारची विविध कामे/कंत्राटे दिली जातील असे सांगितले. लवकरच ही योजना सुरू होणार आहे. 

‘बिहारमध्ये जातात अन् तिथे महाराष्ट्राची बदनामी करतात’पंतप्रधान मोदी नेहमीच सांगतात आणि ही वस्तुस्थिती आहे की महिलांनी आम्हाला नेहमीच मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. मात्र, काहीजण व्होटचोरीचा आरोप करतात. व्होटचोरी नाही त्यांचे डोके चोरी झाले आहे.

आता ते बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. लाडक्या बहिणींच्या मतांना ते चोरी म्हणतात, खरे चोर तर असा आरोप करणारेच आहेत, त्यांच्या डोक्यात थोडी अक्कल येवो,  असा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र