शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

दुष्काळावरून सरकाराचे राजकारण, विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 4:44 AM

तुमच्या काळात दुष्काळाच्या नावाखाली सरकारी निधीवर डल्ला मारला गेल्यानेच यंदा कडक नियम करावे लागल्याचा प्रतिहल्ला सत्ताधाऱ्यांनी केला.

मुंबई : दुष्काळी उपायोजनेच्या मुद्दयावरून मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप झाले. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ पडलेला असताना सरकार दुष्काळी उपाययोजनेतही राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, तुमच्या काळात दुष्काळाच्या नावाखाली सरकारी निधीवर डल्ला मारला गेल्यानेच यंदा कडक नियम करावे लागल्याचा प्रतिहल्ला सत्ताधाऱ्यांनी केला.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या, असा तारांकीत प्रश्न काँग्रेस गटनेचे शरद रणपिसे यांनी उपस्थित केला. सरकारने सर्व प्रकारचे काटेकोर नियोजन केले. राखीव पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होणार नाही याबद्दल सरकार गंभीर आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. दरम्यान, दुष्काळाबाबत सर्वपक्षीय सदस्यांचे प्रश्न, सूचना सभागृहनेत्यांना द्या. दुष्काळ निवारणाबाबतची यंत्रणा विविध स्तरावर राबवली तर दुष्काळावर मात करणे सोपे जाईल अशी सूचना सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. तर, दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्गातल्या प्रवेश शुल्क माफ करण्याची मागणी काही सदस्यांनी केली. यावर विचार करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूबछावण्यांबाबत सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर, सरकारने कोणताही दुजाभाव केला नाही, आघाडी सरकारच्या काळात ज्या पद्धतीने चारा छावण्यांमध्ये गैरप्रकार झाले ते रोखण्यासाठी कठोर नियम केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप केला. आरोपप्रत्यारोपामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

टॅग्स :droughtदुष्काळ