शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
3
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
4
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
5
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
6
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे ट्रॅव्हल अम्मा?
7
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
8
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
9
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
10
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
11
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
14
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
15
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
16
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
17
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
18
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
19
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
20
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल

पायाभूत सुविधांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: February 5, 2017 04:10 IST

सरकारने दोन वर्षांपासून पायाभूत सेवासुविधा विकसित भरण्यावर अधिक भर दिला आहे. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून त्यामुळे भविष्यात अच्छे दिन येतील, असे मत एमईपी

- अमोद काटदरे, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

सरकारने दोन वर्षांपासून पायाभूत सेवासुविधा विकसित भरण्यावर अधिक भर दिला आहे. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून त्यामुळे भविष्यात अच्छे दिन येतील, असे मत एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष जयंत म्हैसकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपात म्हैसकर यांची प्रकट मुलाखत निवेदक अरविंद विंझे आणि शैलेश पेठे यांनी घेतली. त्या वेळी म्हैसकर बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते हा पायाभूत सुविधांचा कणा आहे. देशभर रस्त्यांचे सक्षम जाळे विणून चांगली कनेक्टिव्हिटी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परदेशांतील रस्त्यांच्या धर्तीवर येथे रस्ते विकसित केले जाऊ शकतात. रस्त्यांच्या देखभालीसाठी सरकारने पथकर आकारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रचंड नाराजी व्यक्त केली. मात्र, चांगली सेवा दिली की, ते पथकर भरण्यासाठी हात आखडता घेत नाहीत.ते पुढे म्हणाले की, माझे शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले. शाळा ही आपल्या आयुष्याची सुरुवात आहे. ही आपल्याला घडवते. आपला अर्धा वेळ शाळेत जातो. शाळेत जे शिकाल, त्याचा भविष्यात फायदा होतो. त्यामुळे अधिक लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. व्यवसायाचे बाळकडू वडील दत्तात्रेय म्हैसकर यांच्याकडूनच मिळाले. व्यवसाय करण्याचे माझेही ठरलेले होते. मात्र, कोणता ते निश्चित नव्हते. वडिलांकडून ५० हजारांचे भांडवल घेऊन व्हिडीओ कॅसेटचा व्यवसाय केला. त्यातून मिळालेला नफा त्यांना परत केला. वडिलांची आयडियल रोड बिल्डर्स ही कंपनी असतानाही २००२ मध्ये एमईपीची स्थापना केली. रस्ते विकास आणि देखभाल, या नवीन संकल्पनेमुळे सुरुवातीला बँकांकडून कर्ज मिळताना अडचणी आल्या. २०१० हे वर्ष या कंपनीसाठी टर्निंग पॉइंट ठरले.