शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

विधी विद्यापीठाला जागा द्या - हायकोर्ट

By admin | Updated: January 15, 2017 02:28 IST

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाकरिता पवईच्या महानगर टेलिफोन निगम लि. (एमटीएनएल)बरोबर करार करण्यास विलंब लावू नका. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत विद्यापीठाचे

मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाकरिता पवईच्या महानगर टेलिफोन निगम लि. (एमटीएनएल)बरोबर करार करण्यास विलंब लावू नका. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत विद्यापीठाचे स्थलांतर पवईला झालेच पाहिजे, असे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सध्या विधी विद्यापीठाचा कारभार टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या (टिस) आवारात तात्पुरत्या स्वरूपी सुरू आहे. २०१६मध्ये राज्य सरकारने राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी गोराई येथे ६० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला. अद्याप सरकारने या निर्णयावर अंमलबजावणी न केल्याने राज्य सरकारला ही प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले प्रदीप हवनुर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.‘राज्य सरकारने महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ कायदा, २०१४ची अंमलबजावणी करूनही राज्य सरकारने निर्णयाप्रमाणे ६० एकर जागा देण्यासाठी काहीही पावले उचलली नाहीत,’ असे अ‍ॅड. दत्ता माने यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.पहिल्याच वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी दुसऱ्या महाविद्यालयांत प्रवेश घेतला, अशी माहितीही माने यांनी खंडपीठाला दिली. ‘विद्यापीठाला आर्थिक साहाय्य करणे, सरकारचे कर्तव्य आहे. स्टडी हॉल, लायब्ररी व अन्य सुविधा विद्यापीठाला पुरवण्यात याव्यात. अन्यथा हे विद्यापीठ स्थापन करण्याचा सरकारचा हेतू निष्फळ ठरेल,’ असा युक्तिवाद माने यांनी केलात्यावर उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपी हे विद्यापीठ टिसच्या आवारातून पवई एमटीएनएलच्या कार्यालयात स्थलांतरित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. एमटीएनएल कार्यालयाच्या इमारतीमधील सुमारे २५ हजार चौ. फुटांचे दोन मजले रिकामे आहेत. त्यामुळे एमटीएनएलबरोबर करार करून ही जागा ताब्यात घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली. (प्रतिनिधी)