शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजचे पैसे मिळण्यासाठी आॅगस्ट उजाडणार

By admin | Updated: June 11, 2015 00:44 IST

केंद्राचे साखर उद्योगाला कर्ज : साखर कारखान्यांची वाट बिकटच; तज्ज्ञांनी व्यक्त केल्या शक्यता

विश्वास पाटील - कोल्हापूर -केंद्र शासनाने बुधवारी देशातील साखर उद्योगासाठी बिनव्याजी सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून, त्यातील महाराष्ट्राच्या वाट्याला १८५० कोटी रुपये येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाच्या पातळीवरील सूत्रांनी दिली; परंतु हे पैसे कारखान्यांना मिळण्याची वाट बिकट असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आॅगस्ट उजाडण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे.यंदाच्या हंगामात देशात २८ कोटी टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातील महाराष्ट्राचा वाटा नऊ कोटी टनांचा आहे. याचा अर्थ एक-तृतीयांश साखर उत्पादन एकट्या महाराष्ट्राचे आहे. त्यामुळे त्या हिशेबाने राज्याला केंद्राच्या पॅकेजमधील सुमारे दोन हजार कोटी रुपये मिळतील, अशी शक्यता होती; परंतु आता १८५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम देतानाही केंद्र शासनाने कारखान्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा केला आहे. कारखान्यांनी आता त्यांची थकीत देण्यापैकी (ती किती तारखेपर्यंतची याचीही स्पष्टता नाही.) किमान पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी अदा करावी. ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम अदा केली, त्यांची यादी केंद्र शासनाकडे जमा झाल्यावर शासन उर्वरित ५० टक्क्यांची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या थेट जनधन खात्यावर जमा करणार आहे. या रकमेचे व्याज ६०० कोटी रुपये होईल. तेवढीच रक्कम केंद्र शासन साखर विकास निधीतून देणार आहे. पॅकेजची रक्कम म्हणजे कर्ज आहे. ते कारखान्यांना लगेच पुढील वर्षी परतफेड करायचे आहे. जूननंतर कारखान्यांनी शेतकऱ्यांची यादी दिल्यानंतर केंद्र शासनाच्या पातळीवरील कार्यवाही होऊन पैसे खात्यावर जमा होण्यास आॅगस्ट उजाडण्याची शक्यता आहे.ही रक्कम मिळण्यात महत्त्वाच्या दोन-तीन गोष्टी अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत. एक तर थकीत देणी देण्यासाठी कारखान्यांकडे आता एक रुपयाही नाही म्हणून तर सगळी ओरड सुरू आहे. त्यामुळे थकीत देण्यांपैकी पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना देणार कोठून, हाच कळीचा मुद्दा आहे. ही रक्कम जोपर्यंत दिली जात नाही, तोपर्यंत पुढील पन्नास टक्के कर्जाची रक्कम मिळणार नाही. याचा अर्थ बहुतांश कारखान्यांना या कर्ज पॅकेजचा लाभ मिळणार नाही. या रकमेची लगेच पुढील वर्षी परतफेड करायची आहे. गेल्या वर्षी केंद्र शासनाने दिलेल्या पॅकेजची वसुली पुढील वर्षी सुरू होत आहे. यंदाच्या हंगामात ऊसबिलेही देता आलेली नाहीत. त्याचे ओझे डोक्यावर असताना तोपर्यंत पुढील वर्षी हे कर्ज फेडणार कशातून? अशी विचारणा कारखानदारीतून होऊ लागली आहे.