शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

किल्ले अंजनेरी

By admin | Published: April 30, 2017 2:40 AM

किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना

- गौरव भांदिर्गे

अंजनीसुत हनुमानाचे जन्मस्थान असलेला किल्ले अंजनेरीगडदर्शन :- किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना सासू आणि नवरी म्हणतात. गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते. या वाटेने गावाला लागून असलेला डोंगर उजव्या हाताने वर चढून गेल्यावर आपण जीपगाडीच्या मार्गावर येतो. पुढे कच्च्या रस्त्याने साधारण अर्ध्या तासानंतर आपण आम्रवृक्षांशेजारी पोहोचतो. तेथून उजव्या हाताने पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढाई करायची. साधारण १००-१२५ पायऱ्या, मध्येच सपाटी, पुन्हा पायऱ्या असे टप्पे पार केल्यावर आपण दोन कातळकड्यांमधील खिंडीच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून संपूर्ण मार्ग पायऱ्यांचा आहे.या पायऱ्यांनी जात असताना डाव्या बाजूस कातळात खोदलेली एक जैन गुंफा आहे. तिथून खिंडीतल्या पायऱ्यांनी किल्ल्याच्या सपाटीवर पोहोचायचे. सपाटीवर कोरडे टाके व भग्न तटबंदीचे अवशेष दिसतात, तसेच वर चढून गेल्यावर आपण हनुमान तळ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने कातळात खोदलेल्या सीतागुंफेत पोहोचतो. येथे काही शिल्पे, चौकटी प्रवेशद्वार, दगडी घडीव पायऱ्या, द्वारपालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. येथून गर्द झाडीतून बालेकिल्ल्यावर पोहोचायचे. ही वाट म्हणजे खडी चढाई आहे. शासनाने रेलिंग लावलेल्या आहेत. याच्या आधारे वर चढाई करावी व मधल्या टप्प्यावर डाव्या बाजूला जावे. आपणास एक कातळकोरीव गुंफा लागते. येथेच हनुमानाचा जन्म झाला, असे सांगितले जाते. पुन्हा रेलिंगकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. येथून १५ मि. चालून गेल्यावर आपण अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. या मंदिरात अंजनीमातेची मूर्ती व तिच्या मांडीवर बसलेला हनुमान अशी मूर्ती आहे. मंदिरामागेच इतिहासकालीन इमारतींचे चौथरे आहेत. परतीसाठी आल्यावाटेने परत जावे. जाताना अंजनेरी गावात १२व्या शतकातील हिंदू व जैन मंदिरे आवर्जून पाहावीत व तेथून ४ कि.मी. अंतरावर असलेले जगातील सर्वांत मोठे नाणिसंग्रहालय पाहावे.किल्ल्यावर जाण्याच्या वाटानाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडायची व २० कि.मी. अंतरावर असलेल्या अंजनेरी फाट्यावर उतरायचे. येथून डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने चालू लागायचे. येथून अंजनेरी गावात पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो.इतिहासअंजनेरी किल्ल्याचा उल्लेख अगदी राष्ट्रकुट काळापासून मिळतो. हा परिसर चालुक्यांच्या अंमलाखाली होता. त्या वेळी अंजनेरी गाव त्र्यंबकेश्वरहून मोठे होते. दीड हजार वर्षांपूर्वी गवळी राजाची राजधानी होती. शिवकालात आॅक्टोबर १६७०मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड जिंकून घेतला, त्याच वेळी अंजनेरीसुद्धा स्वराज्यात आला. पुढे १७५०मध्ये निजामाच्या ताब्यात गेला. पुढे पेशवे काळात राघोबादादा पेशवे यांनी किल्ल्यावर विश्रांतीसाठी एक वाडा बांधला होता. नंतर इंग्रजांनी हनुमान तळ्याच्या काठावर थंड हवेचे ठिकाण म्हणून एक बंगला बांधला होता. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.