शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 25, 2020 13:43 IST

सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही.

ठळक मुद्देठाकरे सरकारला राज्यातील जनतेशी काहीही देणे घेणे नाही, राम शिंदेंचा आरोप केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या - राम शिंदे या सरकारच्या काळात मोठे घोटाळे, राम शिंदेंचा आरोप

अहमदनगर - ठाकरे सरकारला राज्यातील जनतेशी काहीही देणे घेणे नाही. केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या आहे. सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ गेला आहे. मात्र, तरीही रुग्णांना सुविधा देण्यात हे  सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात मोठे घोटाळे झाले आहेत. गव्हाचा घोटाळा असेल, तांदळाचा घोटाळा असेल. कारण केंद्र सरकारने लोकांसाठी दिलेले अन्नधान्य पोहोच करण्याची दानतही या सरकारमध्ये राहिली नाही. या सरकारमध्ये समन्वय नाही, असा गंभीर आरोप भाजपा नेते तथा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारवर केला आहे. याच बरोबर त्यांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार का पडू देत नाही? हेदेखील सांगितले.

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर भाजपच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगले समजते, की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सत्तेत आहोत. यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही, सरकार चालवायचे आणि सरकारमध्येच रहायचे. असेच त्यांचे काम सुरू आहे. 

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

राज्यातील विदारक चित्र या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही -सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. लोकांच्या विकासाचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे पंचनामे आणि दुष्काळ, अशा प्रश्नांवर हे सरकार बोलायलाही तयार नाही. या सरकारला अनेक क्षेत्रात अपयश आले आहे. हे विदारक चित्र या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या गोष्टींसाठी हे सरकार बनले आहे, त्या दिशेने त्यांना यश येताना दिसत नाही. त्यांच्याकडून कोणताही निर्णय होत नाही,' अशी टीकाही शिंदे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

राज्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न -राज्याचे गृहमंत्री म्हणाले, अधिकाऱ्यांनी सरकार पाडाण्याचा प्रयत्न केला. जर अधिकारी सरकार पाडायला निघाले असतील, तर स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. असे होत असेल तर सरकार काय करत आहे? असा सवालही शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. ज्या अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करत नाही. एवढेच नही, तर त्या अधिकार्‍याची नावेही सांगत नाहीत. हा सर्व प्रकार राज्यातील नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना