शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला होणार पहिले युवा संमेलन

By admin | Updated: November 1, 2015 00:54 IST

युवा साहित्यिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीतील साहित्यिक अभिरुची टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पहिले अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन औरंगाबदमध्ये

पुणे : युवा साहित्यिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीतील साहित्यिक अभिरुची टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पहिले अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन औरंगाबदमध्ये होणार आहे. ही माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१२मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आखण्यात आले. या धोरणातील योजना क्र. ८ अंतर्गत युवा साहित्य संमेलन ही बाब अंतर्भूत करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर प्रतिवर्षी १८ ते ३५ वयोगटातील युवकांसाठी युवा साहित्य संमेलन आयोजित करावे, यासाठीच राज्य शासनाने अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे या पहिल्या युवा साहित्य संमेलनाची जबाबदारी मराठवाडा साहित्य परिषदेने उचलली आहे. हे संमेलन फेब्रुवारी २०१६मध्ये होण्याची शक्यता
आहे.
त्यासाठी एकूण १० मान्यवर सदस्यांची मार्गदर्शक समिती नेमण्यात येणार आहे. या मार्गदर्शक समितीमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचे ४ पदाधिकारी, साहित्य महामंडळाचे ३ पदाधिकारी तसेच मुंबई साहित्य संघाच्या उषा कांबळे, विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर, अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे आदी मान्यवरांचा समावेश असेल.