शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षपूर्ण राजकारणाची अखेरची निवडणूक

By admin | Updated: September 8, 2014 02:49 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली

वसंत भोसले, कोल्हापूरकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी आपल्या राजकीय वाटचालीला एक वेगळे वळण दिले. गेली ४५ वर्षे सक्रिय राजकारणात असणारे डॉ. कदम यांनी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही शेवटची निवडणूक लढविणार असल्याचे सांगून त्यांच्या राजकारणाला नवे वळण दिले. सांगली जिल्ह्यातील सोनहिरा खोऱ्यातील सोनसळ गावी ८ जानेवारी १९४४ रोजी जन्मलेल्या डॉ. कदम यांनी आपला राजकीय प्रवास एसटी महामंडळाचे संचालक म्हणून सुरू केला. १९७८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर भिलवडी-वांगी हा खानापूर आणि तासगाव तालुक्यांतर्गत मतदारसंघ निर्माण करण्यात आला. त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी तेव्हापासून केली. १९८० मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक काँग्रेसचे उमेदवार संपतराव चव्हाण यांच्याविरुद्ध लढविली आणि केवळ २३३ मतांनी ते हरले.पहिल्याच निवडणुकीपासून त्यांना बंडखोरी, संघर्ष आणि तीव्र राजकीय लढा द्यावा लागला, तो आजअखेर सुरू आहे. त्यानंतर १९८५, १९९०, १९९५, १९९७ (पोटनिवडणूक), १९९९, २००४ आणि २००९च्या विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. एकूण आठ निवडणुकांपैकी दोन वेळा ते अपक्ष म्हणून लढले. उर्वरित सहा वेळा काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंग्ांणात राहिले. या आठपैकी पोटनिवडणुकीसह तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर पाच निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा त्यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादीतून लढून त्यांना प्रखर विरोध केला. त्यावेळच्या प्रचारसभेत ते म्हणायचे, ‘माझे राजकीय जीवन ही दुसरी बाजू आहे. शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रांतील कार्य हा माझा मुख्य आधार आहे.’ आणि ते त्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. पूर्वी सुधाकरराव नाईक, शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गेल्या १५ वर्षांतील सरकारमध्ये ते कायम कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाच्या पदावर कार्यरत राहिले आहेत. आगामी निवडणुकीतदेखील त्यांना पहिल्या निवडणुकीसारखाच राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. अशा संघर्षपूर्ण नेत्याने वयाच्या ७०व्या वर्षी, ‘ही माझी अखेरची निवडणूक आहे,’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणातदेखील उमटतील.