शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

परभणीतील फरकंड्यात ग्रामपंचायत वादातून हाणामारी, ६० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 4:28 AM

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार भांडणात झाले.

पालम (जि. परभणी) : तालुक्यातील फरकंडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्याद देण्यास गावातील कोणीही पुढे न आल्याने सरकारी फिर्यादीवरून दोन गटांतील ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार भांडणात झाले. ऐनवेळी वीज गेल्याने लाठ्याकाठ्यानी एकमेकांशी तुंबळ हाणामारी सुरू करण्यात आली. यात दोन्ही गटांतील ८ जण जखमी झाले असून, पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलीस गावात बंदोबस्तासाठी दाखल झाले. परिस्थिती आटोक्यात आली असून, गावातून कोणीही फिर्याद दिली नाही. त्यामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष बाबुराव आगळे यांच्या फिर्यादीवरून विजयी गटातील ४५, तर पराभूत गटातील २० अशा६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात कबीरवाडी, हिरानगरमध्ये राडा --    नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतरही अनेक गावांमध्ये राडेबाजी सुरूच आहे. मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कबीरवाडी आणि मुक्रमाबाद हद्दीत हिरानगर तांडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून मारहाणीच्या घटना घडल्या. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. अनेकांची यात डोकी फुटली तर दोन्ही गटातील शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले.-    सोमवारी मतमोजणी झाल्यानंतरही काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. मौजे कबीरवाडी येथे बालाजी सोपान सलगरे यांनी तक्रार दिली. ग्रामपंचायत निवडणुकीत मदत का केली नाही म्हणून विराेधी गटाच्या सदस्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणात मरखेल ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तर मुखेड तालुक्यातील हिरानगर तांडा येथे सुनीता विजय राठोड या महिलेला कुणाला मतदान केले असे म्हणून दगडाने मारहाण करण्यात आली तसेच गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस