शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

Exclusive: ...म्हणून शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवावी; सांगताहेत धनंजय मुंडे

By राजा माने | Published: February 13, 2019 5:16 PM

२०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत.

- राजा माने

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील वजनदार नेते, मोदी सरकारच्या विरोधात महाआघाडीची मोट बांधणारे महागुरू शरद पवार स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात, 'माढामधून लढण्याच्या नेत्यांच्या आग्रहाबाबत मी विचार करेन', असं सूचक विधान पवारांनीच केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. २०१४च्या निवडणुकीआधी पवारांनी स्वतःहून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा लढवावी का, यावरून मतमतांतरं आहेत. परंतु, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत का उतरलं पाहिजे, याबाबतची राष्ट्रवादीची दुसऱ्या फळीची भूमिका आज पक्षाचे धडाकेबाज नेते धनंजय मुंडे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केली.

'माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेला मतदारसंघ आहे. शरद पवार याआधीही या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेत. आजही या मतदारसंघात अनेक प्रबळ उमेदवार आमच्याकडे आहेत. परंतु, शरद पवार यांनी स्वतः यावेळची निवडणूक लढवल्यास, ही लढाई आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, मतदाराला कळेल, स्वतः सेनापती रणांगणात उतरल्याचं पाहून मावळेही तुटून पडतील. या हेतूनेच अजित पवार, छगन भुजबळ जयंत पाटील, विजयसिंह आणि मी स्वतः पवारांना पुन्हा निवडणूक लढवण्याची गळ घातली', असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. शरद पवारांनी निवडणूक लढवल्यास मतदारांमध्ये १५ टक्क्यांचा स्विंग होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. नेता हा पक्ष चालवत असतो. धोरणं ठरवत असतो. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर काही गोष्टी त्याला मान्यही कराव्या लागतात, असं सूचित करतानाच, शरद पवारांनी अद्याप होकार दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी नमूद केलं. 

शरद पवार यांना माढ्याच्या रिंगणात उतरवल्यास ते तिथेच बांधले जातील, हा समज सगळ्यांनीच डोक्यातून काढून टाकावा. कारण, त्यांनी माढ्यामध्ये प्रचार केला नाही, सभा घेतली नाही आणि देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या पहिल्या पाच खासदारांमध्ये शरद पवार असतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.   

गेल्या चार वर्षात विरोधी पक्ष म्हणून काम करताना, सामान्य माणसांच्या प्रश्नावर संघर्ष करून आम्ही गमावलेला विश्वास परत मिळवला आहे. त्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरेल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. 

शरद पवारांची संपूर्ण मुलाखत...

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Dhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस