शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शिक्षण विभाग सुरू करणार ' शैक्षणिक चॅनल '

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 12:39 IST

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र चॅनल सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल

ठळक मुद्देसध्या चॅनल सुरू करण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार सुरू प्रवेशपूर्व परीक्षांचे व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शक कार्यक्रमही

राहुल शिंदे -पुणे: विद्यार्थ्यांना घरबसल्या आपल्या पुस्तकातील विविध घटकांची उजळणी करता यावी, अवघड वाटणारा विषय सहज समजावा, कविता चालीमध्ये कशा म्हणाव्यात, गणित कसे सोडवावे आदींचे ज्ञान राज्यातील विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणी संचावरून (टीव्ही) मिळू शकणार आहे. त्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र चॅनल सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्टॉनिक माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘स्वयंम’च्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमाची उपलब्ध करून दिली आहे. त्यातच आता देशातील सर्व राज्यांनी आपल्या बोलीभाषेतील शैक्षणिक चॅनल सुरू करावे,अशा सूचना एमएचआरडीकडून प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी ) अधिका-यांनी नुकतीच गुजरात राज्यातील शैक्षणिक चॅनलची पाहणी केली आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, एमएचआरडीकडून सुमारे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी शैक्षणिक चॅनल सुरू करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले. या पत्रानुसार गुजरात येथील शैक्षणिक चॅनलची पहाणी करण्यात आली आहे. सध्या चॅनल सुरू करण्याबाबत प्राथमिक स्तरावर विचार सुरू आहे. मात्र, पुढील काळात राज्याच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र चॅनल सुरू झाले तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकातील कार्यक्रम घर बसल्या पाहता येतील. एससीईआरटीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यक्रम तयार करता येतील. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रवेशपूर्व परीक्षांचे व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शक कार्यक्रमही दाखवता येतील.--------बालचित्रवाणी का बंद पाडली ? मुला  मुलांची... मजे मजेची... बालचित्रवाणी... हे बोल कानावर पडले की विद्यार्थी दूरचित्रवाणी संचासमोर येऊन बसत होतो.केंद्र शासनाच्या आर्थिक सहकार्याने १९८४ मध्ये मुंबईत बालचित्रवाणी सुरू झाली. दोन वर्षानंतर १४ नोव्हेंबर १९८६ रोजी बालचित्रवाणीचे कामकाज पुण्यातून सुरू झाले. विद्यार्थ्यांसाठी हजारो शैक्षणिक कार्यक्रम बालचित्रवाणीने तयार केले. बालचित्रवाणीचे कार्यक्रम पाहूनच अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. परंतु, केंद्र शासनाने २००३ पासून अनुदान देण्याचे बंद केल्यामुळे बालचित्रवाणीला टाळे लावावे लागले. आता विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्यक्रम पाहून अभ्यास करावा, ही भूमिका समोर ठेऊन एमएचआरडीने सर्व राज्यांना शैक्षणिक चॅनल सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. मग पुण्यातील ‘बालचित्रवाणी’ का बंद पडली? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठEducationशिक्षणTelevisionटेलिव्हिजनTeacherशिक्षक