शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

दारूविरुद्ध संत्रीबाईचा दुर्गावतार

By admin | Updated: September 28, 2014 01:55 IST

गावात दारूबंदी होईल, असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र याच गावातील संत्रीबाई विश्वनाथ राठोड या महिलेने दुर्गावतार धारण करीत दारूबंदी केली.

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
तिवसा हे बाराशे उंबरठय़ाचे गाव. पंचक्रोशीतील गावांसाठी दारूचे मार्केट. एक घर सोडून दारूची निर्मिती व विक्री होणा:या या गावात दारूबंदी होईल, असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र याच गावातील संत्रीबाई विश्वनाथ राठोड या महिलेने दुर्गावतार धारण करीत दारूबंदी केली. 
यवतमाळ तालुक्यातील तिवसा हे गाव हातभट्टीच्या दारूसाठी प्रसिद्ध होते. येथील बहुतांश कुटुंबांचा दारू गाळणो आणि विकणो हा व्यवसाय होता. गावात शंभर हातभट्टय़ा होत्या.  दारुडय़ांचा सर्वाधिक त्रस महिलांना सहन करावा लागत होता. दररोजची भांडणो, त्यातून पोलिसांर्पयत गेलेली प्रकरणो यामुळे गावाचा विकासही खुंटला होता. एव्हढेच नाही, तर अनेकांना दारूमुळे अनेकांचा  मृत्यू झाला. गावातील एका राठोड परिवारातील तर सर्व पुरुष मंडळी अतिमद्य सेवनाने मृत्युमुखी पडली. आता या घरात केवळ महिलाच राहिल्या. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती. परंतु कुणीही दारू विकणो आणि पिणोही थांबवत नव्हते. कारण गावात दारू विकणा:यांचे वर्चस्व होते.  कुणी पोलिसात तक्रार केली तर दारूविक्रेते त्याला सळो की पळो करून गावात जगणो मुश्कील करीत होते. अशा या गावात दारूबंदी होईल असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र एका महिलेने दुर्गावतार धारण केला आणि गावात कायमची दारूबंदी झाली. 
संत्रीबाई विश्वनाथ राठोड असे या महिलेचे नाव आहे. तिसरी शिकलेल्या या महिलेचे माहेर तिवसाच आहे. 3क् वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील दहेली तांडा येथील विश्वनाथ राठोडसोबत तिचा विवाह झाला. मात्र दोनच महिन्यांत पतीचे निधन झाले. ती भाऊ धनराज जाधव, मुलचंद जाधव यांच्या आश्रयाने पुन्हा तिवसातच आली. गावात दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार जवळून पाहत होती. घरासमोर पडून असणारे दारुडे, त्यांची शिवीगाळ नेहमी कानावर पडायची. तिने गावात दारूबंदीचा विडा उचलला. गावातील 12 महिला बचत गट एकत्र आणले. गावात जगदंबा बचत गटाची स्थापना केली. त्यांच्या सोबतीला मुक्ता चव्हाण, कौशल्या मोहन राठोड, सुरेखा राठोड, लक्ष्मी राठोड, नंदा कुमरे, प्रीती चव्हाण, उषा सुलकर यांच्यासह शंभरावर महिला आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि दारूबंदी विभागाला निवेदन दिले.   गावक:यांनी टिंगल-टवाळी करीत या महिला काय दारूबंदी करू शकतात, असे टोमणो मारले. मात्र या महिला आपल्या निर्धारावर कायम होत्या. गावातील दारूविक्रेत्यांना त्यांनी समजावून सांगितले. परंतु कुणीही ऐकत नव्हते. त्यामुळे गावालगतच्या जंगलात सुरू असलेल्या हातभट्टय़ांवर या महिला धाडी मारू लागल्या. परंतु त्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. 
शेवटी गावातील सर्व महिला एकत्र आल्या आणि 27 जुलै 2क्13 रोजी दुर्गावतार धारण केला. गावातील शंभर हातभट्टय़ा उद्ध्वस्त केल्या. 1 ट्रॅक्टर मोहाची दारू, 5क्क् पिंप आणि 5क् मोठय़ा टाक्या दारू जप्त केली. महिलांना प्रचंड विरोध झाला. परंतु त्यांनी कुणालाही जुमानले नाही. सरळ ट्रॅक्टरभर दारू घेऊन यवतमाळचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.  परिणाम व्हायचा तोच झाला. गावातून दारू हद्दपार झाली ती कायमची. आता वर्षभरानंतरही या गावात दारूचा थेंब मिळत नाही. काही सवयीचे गुलाम दारुडे बाहेरगावी जाऊन दारू पितात, परंतु तेही चूपचाप. 
त्या आंदोलनाबद्दल संत्रीबाई राठोड सांगतात, आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नव्हते. दारूमुळे त्रस्त झालेल्या आम्ही महिला एकत्र आलो आणि आमची शक्ती दाखवून दिली. यासाठी सरपंच उदयसिंग राठोड, उपसरपंच शंकर पवार आणि अधिकारी, कर्मचा:यांनीही आम्हाला सहकार्य केले. आज शेकडो महिलांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत. दारूबंदी झाली त्या काळात दोन महिने तर झोप येत नव्हती. दररोज दारुडय़ांकडून धमक्या येत होत्या. आमच्याबद्दल गैरसमज पसरविले जात होते. परंतु तिवसा हे माङो जन्मभूमीचे गाव आहे आणि ते दारूमुक्त केले याचा मला अभिमान आहे. या आंदोलनासाठी लाडखेडचे तत्कालीन ठाणोदार संजय शिरभाते यांना महिलांनी विनवणी केली होती. परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. या आंदोलनानंतर त्यांना निलंबित केले. 
 
दारूबंदी करणा:या महिलेवर विळ्याचे 11 वार 
संत्रीबाईच्या टीममधील शोभा राठोड या महिलेवर दारूबंदीनंतर 5 महिन्यांनी दारूविक्रेत्याने हल्ला केला. एक-दोन नव्हेतर विळ्याचे तब्बल 11 वार केले. रक्तबंबाळ शोभाबाईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी हल्ला करणा:या गोपाळ राठोडला महिलांनी चांगलेच बदडून पोलिसांच्या हवाली केले. दुर्गादेवीची कृपा म्हणून आमची सहकारी बचावली, असे संत्रीबाई सांगते. 
 
आज या महिलांची दारुडय़ांत एवढी दहशत आहे की कुणी दारू गाळायचे तर सोडा पिण्याचाही विचार करीत नाही. संत्रीबाईचा हा आदर्श इतर गावांतील महिलांनीही घेतला असून, परिसरातील सहा ते सात गावांत दारूबंदी झाली. तिवसा येथे तर विशेष कार्यक्रमात न्यायाधीश एस.एम. आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.