शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने नाशकात पेरण्या संकटात

By admin | Updated: July 6, 2014 01:05 IST

अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे.

गणोश  धुरी - नाशिक
अगदी 7 जूनलाच नियमाने हजेरी लावण्याची नाशिकला परंपरा असलेल्या पावसाने गेल्या वर्षापासून ‘हजेरीत’ बदल केल्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता काहीशी वाढली आहे. यंदा तर जून संपून जुलै उजाडला तरी तुरळक अपवाद वगळता मान्सूनने दडी मारल्याने खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या संकटात सापडल्या असून, भात-नागली पिके हातची जाण्याची भीती व्यक्त आहे, तर तूर, भुईमुगाची पिके पावसाअभावी जळाल्याने या हंगामात या पिकांचे उत्पादन नगण्य राहण्याचा धोका वाढला आहे. 
गंगापूर धरणाचा अपवाद वगळता अन्य धरणांमध्ये 1क् ते 15 टक्क्यांच्या आतच जलसाठा असून, नाशिक शहरात आता पाणीकपात सुरू होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या पर्जन्यमानाची आकडेवारी पाहिल्यास 2 जुलैर्पयत मागील वर्षी 249 मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो अवघा 28.75 मि.मी. इतकाच झाला आहे. 
   पाऊस लांबल्याने खतांच्या विक्रीवरही प्रतिकूल परिणाम होऊन 4क् हजार मेट्रिक टनांहून जादा खते विक्रीअभावी पडून आहेत. लांबलेल्या पावसाने कापूस, मका या पिकांचे क्षेत्र घटून बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रंनी व्यक्त केली आहे. 
 
खरिपाच्या पेरण्यांवर संकट
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख 34 हजार 6क्क् हेक्टर असून, यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. ज्या काही 444 हेक्टर क्षेत्रवरील नाममात्र पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यात मका, तूर, कापूस या पिकांसह ऊसाचा समावेश आहे. 
धरणो कोरडीठाक
हवामान खात्याचा अंदाज पावसाने यावेळी खरा ठरविला आहे. जिल्ह्यातील धरणांची स्थिती बिकट झाली असून, यांतील जलसाठय़ाचे प्रमाण नऊ टक्के इतके अत्यल्प राहिले आहे. गौतमी गोदावरी, तीसगाव, कश्यपी, मुकणो, कडवा, भोजापूर, हरणबारी व नागासाक्या या आठ धरणांनी तळ गाठला आहे.
 
कमी झालेली सरासरी
 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी 1 जून ते 2 जुलैदरम्यान अत्यंत नाममात्र म्हणजेच 284 मिलिमीटर इतकी कमी राहिलेली आहे. यावर्षी 1 जून ते 2 जुलै यादरम्यान अवघा 431.3 मि़मी़ पाऊस झालेला आह़े  
वार्षिक सरासरीच्या 28 } 
जिल्ह्याची वार्षिक सरासरी 1क्13.39 इतकी असताना, 2 जुलै 2क्13 ला 249.37 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद नोंदविण्यात आली होती. यावर्षी वार्षिक सरासरीच्या 1 जून ते 2 जुलै दरम्यान पावसाची अवघी 28.75 मि़मी़ इतकी नाममात्र नोंद झाली आहे.
टॅँकरचे दीड शतक
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवत असून, त्यासाठी जूनअखेर 541 गावे व वाडय़ांना 161 टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक सिन्नर - 71, बागलाण- 28, सुरगाणा- 14, त्र्यंबकेश्वर, चांदवड व देवळा प्रत्येकी- 1क्, दिंडोरी- 2, पेठ- 4, येवला- 1, मालेगाव- 1, कळवण-1, नांदगाव- 2 व भगूर- 2 टँकरचा समावेश आह़े 
कापूस, मका घटणार
पाऊस लांबल्याने खरिपात लागवड केलेली भुईमूग व तूर पिके जळाली असून, या पश्चिम भागातील भात व नागलीच्या पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे.