शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

दुष्काळाचे संकट : पाच जिल्ह्यातील तब्बल २ लाख पशुधन चारा छावण्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 11:56 IST

राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे पाणी आणि चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देराज्यात सुमारे ३ कोटी २० लाख ९४ हजार पशूधन पशुधनाला ११ लाख मेट्रिक टन हिरव्या तर ४४१ लाख मेट्रिक टन वाळलेल्या वैरणीची आवश्यकता पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये राहत शिबिर घेण्यास मान्यता बीड जिल्ह्यातील ३ हजार ९०० तर जालनामध्ये १५६, परभणीत ६९० आणि नगरमध्ये ३८० पशुधन दाखल पशूसंवर्धन विभागातर्फे चारा छावण्या व राहत शिबीरातील जनावरांच्या आरोग्याची काळजी

पुणे : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे पाणी आणि चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. तीन जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने राहत शिबिरांना मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या पाच जिल्ह्यात एकूण १ लाख ९५ हजार १४२ पशुधनासाठी चाºयाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.परतीच्या पावसाने पाठ पिरवल्याने राज्यात अनेक जिल्ह्यात पेरण्याच होऊ शकल्या नाहीत. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. नागरिकांबरोबरच पशुधनही दुष्काळाने बाधित झाले आहे. त्यामुळे अहमदनगर व बीड जिल्ह्यात महसूल विभागातर्फे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर पशुसंवर्धन विभागाने उस्मानाबाद ,जालना आणि परभणी या जिल्ह्यांसह नगर आणि बीड जिल्ह्यातही राहत शिबिर घेण्यास मान्यता दिली आहे. राज्यात एकूण ३६४ पशु छावण्या सुरू असून त्यात महसूल विभागाच्या ३५६ चारा चावण्या,पशुसंवर्धन विभागाची ६ राहत शिबिरे आणि स्वयंसेवी संस्थांकडून सुरू करण्यात आलेल्या दोन छावण्यांचा समावेश आहे. राज्यात नगर जिल्ह्यात सध्या १६४ चारा छावण्या सुरू असून त्यात ८४ हजार ६९५ पशुधनाची देखभाल केली जात आहे. तर बीड जिल्ह्यातील १९२ चारा छावण्यांमध्ये ८५ हजार ६७६ पशुधन दाखल झाले आहे. या छावण्यांमध्ये लहान पशुधनाची संख्या २९ हजार १९४ असून मोठे पशूधन १ लाख ६५ हजार ८४८ एवढे आहे.राज्यात दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरूवात झालेली असताना अनेक जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही.---राज्यात सुमारे ३ कोटी २० लाख ९४ हजार पशूधन आहे. या पशुधनाला ११ लाख मेट्रिकटन हिरव्या वैरणीची तर ४४१ लाख मेट्रिक टन वाळलेल्या वैरणीची आवश्यकता भासते. त्यामुळे राज्यात निर्माण झाली दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यात होणारी चारा टंचाई लक्षात घेवून पशुसंवर्धन विभागाने राज्यातील शेतकºयांना २५ हजार क्विंटल चारा पिकाच्या बियानाचे वाटप केले.आत्तापर्यंत राज्यातील १६ हजार ६३८ हेक्टर गाळपेर क्षेत्रावर आणि शेतकºयांच्या ४१ हजार ३५५ हेक्टर शेती क्षेत्रावर अशा एकूण ५७ हजार ८९४ हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांची पेरणी झाली आहे.....चारा छावण्या आणि राहित शिबिरातील पशुधनांची संख्या - महसूल विभागाच्या छावण्या - ३५६- पशु संवर्धन विभागाची राहित शिबिरे  ६,- स्वयंसेवी संस्थांच्या छावण्या -२ अहमदनगरमधील १६४ छावण्यांंमध्ये ८४ हजार ६९५ पशूधन बीडमधील १९२ छावण्यांमध्ये ८५ हजार ६७६ पशूधन एकूण - पशू छावण्यांची संख्या ३६४राहत शिबिरात पशुधन पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये राहत शिबिर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात २ राहत शिबिरे सुरू असून त्यात ९ हजार ८०० पशुधन आहे. तर बीड जिल्ह्यातील राहत शिबिरात ३ हजार ९०० तर जालनामध्ये १५६, परभणीत ६९० आणि नगरमध्ये ३८० पशुधन दाखल झाले आहे. पशूसंवर्धन विभागातर्फे चारा छावण्या व राहत शिबीरातील जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.चारा व पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी शिबीराच्या आयोजकांची असते,असेही पशूसंवर्धन विभागातील अधिका-यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीdroughtदुष्काळ