शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे संकट : पाच जिल्ह्यातील तब्बल २ लाख पशुधन चारा छावण्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 11:56 IST

राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे पाणी आणि चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देराज्यात सुमारे ३ कोटी २० लाख ९४ हजार पशूधन पशुधनाला ११ लाख मेट्रिक टन हिरव्या तर ४४१ लाख मेट्रिक टन वाळलेल्या वैरणीची आवश्यकता पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये राहत शिबिर घेण्यास मान्यता बीड जिल्ह्यातील ३ हजार ९०० तर जालनामध्ये १५६, परभणीत ६९० आणि नगरमध्ये ३८० पशुधन दाखल पशूसंवर्धन विभागातर्फे चारा छावण्या व राहत शिबीरातील जनावरांच्या आरोग्याची काळजी

पुणे : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे पाणी आणि चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. तीन जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने राहत शिबिरांना मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या पाच जिल्ह्यात एकूण १ लाख ९५ हजार १४२ पशुधनासाठी चाºयाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.परतीच्या पावसाने पाठ पिरवल्याने राज्यात अनेक जिल्ह्यात पेरण्याच होऊ शकल्या नाहीत. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. नागरिकांबरोबरच पशुधनही दुष्काळाने बाधित झाले आहे. त्यामुळे अहमदनगर व बीड जिल्ह्यात महसूल विभागातर्फे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर पशुसंवर्धन विभागाने उस्मानाबाद ,जालना आणि परभणी या जिल्ह्यांसह नगर आणि बीड जिल्ह्यातही राहत शिबिर घेण्यास मान्यता दिली आहे. राज्यात एकूण ३६४ पशु छावण्या सुरू असून त्यात महसूल विभागाच्या ३५६ चारा चावण्या,पशुसंवर्धन विभागाची ६ राहत शिबिरे आणि स्वयंसेवी संस्थांकडून सुरू करण्यात आलेल्या दोन छावण्यांचा समावेश आहे. राज्यात नगर जिल्ह्यात सध्या १६४ चारा छावण्या सुरू असून त्यात ८४ हजार ६९५ पशुधनाची देखभाल केली जात आहे. तर बीड जिल्ह्यातील १९२ चारा छावण्यांमध्ये ८५ हजार ६७६ पशुधन दाखल झाले आहे. या छावण्यांमध्ये लहान पशुधनाची संख्या २९ हजार १९४ असून मोठे पशूधन १ लाख ६५ हजार ८४८ एवढे आहे.राज्यात दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरूवात झालेली असताना अनेक जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही.---राज्यात सुमारे ३ कोटी २० लाख ९४ हजार पशूधन आहे. या पशुधनाला ११ लाख मेट्रिकटन हिरव्या वैरणीची तर ४४१ लाख मेट्रिक टन वाळलेल्या वैरणीची आवश्यकता भासते. त्यामुळे राज्यात निर्माण झाली दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यात होणारी चारा टंचाई लक्षात घेवून पशुसंवर्धन विभागाने राज्यातील शेतकºयांना २५ हजार क्विंटल चारा पिकाच्या बियानाचे वाटप केले.आत्तापर्यंत राज्यातील १६ हजार ६३८ हेक्टर गाळपेर क्षेत्रावर आणि शेतकºयांच्या ४१ हजार ३५५ हेक्टर शेती क्षेत्रावर अशा एकूण ५७ हजार ८९४ हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांची पेरणी झाली आहे.....चारा छावण्या आणि राहित शिबिरातील पशुधनांची संख्या - महसूल विभागाच्या छावण्या - ३५६- पशु संवर्धन विभागाची राहित शिबिरे  ६,- स्वयंसेवी संस्थांच्या छावण्या -२ अहमदनगरमधील १६४ छावण्यांंमध्ये ८४ हजार ६९५ पशूधन बीडमधील १९२ छावण्यांमध्ये ८५ हजार ६७६ पशूधन एकूण - पशू छावण्यांची संख्या ३६४राहत शिबिरात पशुधन पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये राहत शिबिर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात २ राहत शिबिरे सुरू असून त्यात ९ हजार ८०० पशुधन आहे. तर बीड जिल्ह्यातील राहत शिबिरात ३ हजार ९०० तर जालनामध्ये १५६, परभणीत ६९० आणि नगरमध्ये ३८० पशुधन दाखल झाले आहे. पशूसंवर्धन विभागातर्फे चारा छावण्या व राहत शिबीरातील जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.चारा व पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी शिबीराच्या आयोजकांची असते,असेही पशूसंवर्धन विभागातील अधिका-यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीdroughtदुष्काळ