शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’च्या स्वप्नाची धुळधाण झाली : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:14 IST

मोदी आणि भाजपावर चढविला हल्ला

बारामती : भाजपाने गेल्या पाच वर्षांत १२५ कोटी जनतेचा भ्रमनिरास केला. ‘अच्छे दिन’च्या स्वप्नाची धुळधाण झाली. ‘अच्छे दिन’ नको, पहिले दिन बरे होते, असे म्हणण्याची लोकांवर वेळ आली आहे. भाजपा सरकारने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे रयत भवनमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी १५ लाख रुपये खात्यावर आणण्यासह विविध स्वप्न दाखविली. त्याला लोकांनी भुलून मतदान केल्याने त्यांचे सरकार सत्तेवर आले. निवडणुकीपूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनाची मोदी सरकारने पूर्तता केली नाही. प्रतिवर्षी दिलेले २ कोटी रोजगारांचे आश्वासन हवेत विरले. उलट गेल्या चार-पाच वर्षांत बेरोजगारी वाढली. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळालीच नाही. उलट कांद्यासारखी शेती उत्पादने मातीमोल भावात विकण्याची वेळ आली. साखर निर्यात होत नाही. साखरेच्या दरासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे होते. मात्र, या सरकारला शेतकऱ्यांचे घेणे देणे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटीला विरोध केला; मात्र केंद्रात सत्तेवर आल्यावर ‘वन नेशन, वन टॅक्स’ अशी घोषणा करीत लागू केला. २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी करआकारणी केली आहे. त्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. व्यापारी वर्ग त्यामुळे नाराज आहे.’’ नोटाबंदीमुळे सगळ्यांचे वाटोळे झाले. सर्जिकल स्ट्राईकचेदेखील राजकारण होत आहे. देशात यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी भूमिका घेतली नाही. गेल्या साडेचार वर्षामध्ये सर्वाधिक जवान शहीद झाल्याचे पवार म्हणाले.या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सभापती संजय भोसले, सदाशिव सातव, सचिन सातव, किरण गुजर, प्रदीप गारटकर, योगेश जगताप, रोहिणी तावरे, बिरजू मांढरे, संदीप जगताप, सुभाष ढोले, शौकत कोतवाल, जवाहर वाघोलीकर आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांचा बेरजेच्या राजकारणाचा सल्लालोकसभा निवडणुकीत मित्र पक्ष असणाºया काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर समन्वय ठेवून बेरजेचे राजकारण करा. आता आठवण आली का आमची, इतके दिवस कोठे होता, अशीही त्यांच्याकडून विचारणा होईल. मात्र, आपण त्यांना बरोबर घेऊन प्रचारात सामील करून घ्या. शिवाय काही भागात दुष्काळाची तीव्रता आहे.पाणी नाही, चारा नाही, सर्वत्र रणरणते ऊन आहे. हाताला काम नाही. तिथेदेखील नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना समजून घेऊन आधार देण्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला अजित पवार यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला.ताकाला जायचं अन् भांडं लपवायचं कारण नाहीवाईट वाटून घेऊ नका; मात्र २०१४मध्ये सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा बारामती तालुक्यातील पारवडीसह विविध गावांमध्ये महादेव जानकर यांना झालेल्या मतदानाचे प्रमाण अधिक होते. यावरून काहीतरी चुकीचे घडत आहे, काही लोकांनी समाज डोक्यात घेतल्याचे जाणवत आहे. ताकाला जायचं भांडं लपवायचं कारण नाही. पूर्वीच्या काळात स्वर्गीय जगन्नाथ कोकरे यांचे जावई विजयराव मोरे निवडणुकीला उभे होते. मात्र, कोकरे यांनी ‘जावयाचा मानपान ठेवू, जेवायला घालू, पोशाख करू; पण मत मात्र शरद पवार यांनाच देऊ,’ अशी भूमिका घेतली. खरी निष्ठा अशी असावी, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी