शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

प्रशासकीय कामांच्या आड निवडणुकीचे कारण आणू नका: उच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 07:22 IST

Mumbai High Court News: मोठ्या मनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धीही मिळेल, असे स्पष्ट करत शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना एक आठवड्याच्या आत लाभ देण्याचा विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी केली.

 मुंबई -  राज्य सरकार विजेच्या वेगाने निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांच्या आड निवडणूक येऊ शकत नाही. मोठ्या मनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धीही मिळेल, असे स्पष्ट करत शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना एक आठवड्याच्या आत लाभ देण्याचा विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी केली. पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होईल. 

दहशतवाद्यांच्या ताब्यातून ओलिसांची सुटका करताना २० मे २०२० रोजी अनुज सूद शहीद झाले. त्यांची पत्नी आकृती सूद यांनी २०१९ व २०२०च्या सरकारी अधिसूचनांनुसार दरमहा भत्ता व अन्य लाभ यांसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. देशासाठी बलिदान देणाऱ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी ‘मोठ्या मनाने’ सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धी मिळेल, असे यावेळी न्यायालय म्हणाले. सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने निर्णय घेण्यासाठी चार आठवडे द्यावेत, अशी विनंती सरकारी वकिलांनी खंडपीठाला केली. त्यावर खंडपीठाने ही मुदत जास्त असल्याचे म्हणत उपर्युक्त सूचना केली.

हा एक महत्त्वाचा निर्णय आहे, हे तुम्ही (मुख्यमंत्री) अधिकाऱ्यांच्या मनावर ठसवाल. अशा प्रकारच्या प्रस्तावाला एक दिवसही विलंब होता कामा नये. खरेतर, अशा व्यक्तींचा महाराष्ट्राला अभिमान असायला हवा. आपले हृदय मोठे असायला हवे. आपण देशातील एकमेव असे राज्य आहे, ज्यामध्ये ‘महा’, असा शब्द आहे.- मुंबई उच्च न्यायालय

म्हणून सरकारी धोरणाचा लाभ देण्यास नकार -आकृती सूद यांनी केलेल्या याचिकेनुसार, सूद कुटुंबाचे महाराष्ट्रात घर आहे. अनुज सूद यांना पुण्यात राहायचे होते, हे कागदपत्रांवरून सिद्ध होते. - मात्र, त्यांच्याकडे १५ वर्षांच्या अधिवासाचा पुरावा नसल्याने तसेच ते या राज्यात जन्मलेले नसल्याने त्यांना सरकारी धोरणाचा लाभ देण्यास नकार देण्यात आला. - प्रशासकीय विभागाच्या अडचणींमुळे आता निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत आहे, असे सामान्य प्रशासकीय विभागाच्या सहायक सचिवांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार