शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

इतिहास लेखनात केवळ उदो उदो नको; ‘चुका ’ ही मांडल्या जायला हव्यात : डॉ. गो.बं देगलुरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 23:00 IST

मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य तज्ञ डॉ. गो.बं देगलूरकर यांना पुरातत्व क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबददल ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

- नम्रता फडणीस - * पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला.काय वाटतं?_- एवढा मोठा मानाचा पुरस्कार मिळाला, त्याबददल आनंद तर आहेच. विविध क्षेत्रातील इतक्या मोठ्या मंडळींना हा पुरस्कार दिला आहे त्यांच्या पंक्तीत मला बसायला मिळाले हे माझे भाग्यसमजतो. * पुण्याशी ॠणानुबंध कसे जुळले? - माझे मँट्रिकपर्यंतचे शिक्षण पंढरपूरमध्ये झाले.  घरातील वडिलधा-या व्यक्तींनी सांगितले की पंढरपूर सोडायचे ठरवले आहे तर पुण्याला जा. तिथे चांगले शिक्षण मिळते. पुण्याच्या स.प महाविद्यालयात प्रवेश घेतला. आम्ही सगळे भाऊ स.प.मध्येच शिकलो.  इतिहास विषय घेऊन पदवी संपादन केली. त्यानंतर हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून एम.ए पूर्ण केले. पुन्हा पी.एच.डी साठी डेक्कन कॉलेजमध्ये आलो. * पुण्यात पदवी आणि पी.एचडी चे शिक्षण पूर्ण झाले, मग प्रबंधाचा विषय मराठवाडा संस्कृतीचा इतिहास हा का निवडासा वाटला? -त्याचे कारण म्हणजे मी मूळचा मराठवाड्याचा उर्वरित महाराष्ट्राचा असा समज आहे की मराठवाडा हा मागासलेला आहे. मग मागासलेला असेल तर हा प्रारंभापासून आहे का? ते पुढे आणावे म्हणून हा विषय घेतला. गुरू म्हणाले, तुमच्या अभ्यासाने सिद्ध झाले की तो मागासलेला आहे तर तुम्ही ते लिहाल का? मी हो म्हटले आणि हा विषय निवडला. * मूर्तिशास्त्र हा विषय अभ्यासासाठी घेण्यामागे कोणता विचार होता? - पुरात्वाचेच मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र तसेच शिलालेख आणि नाणकशास्त्र हे भाग आहेत. भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण हे मंदिरे आणि मूर्ती आहेत. मूर्ती कशाकरिता निर्माण झाल्या? मूर्तिपूजा ही ग्रीस, इटली मध्ये अस्तिवात होती. त्यांच्या संस्कृतीचे संदर्भ बदलत गेले आणि मूर्तिपूजा मागे पडली. भारतात मूर्तिपूजा जा आजही होते, त्याला इतके महत्व का आहे? हे जाणून घ्यावेसे वाटले. एखाद्या समाजाला गुणांची गरज असते तेव्हा त्या गुणांचे समूर्तकरण करणे म्हणजे मूतीर्पूजा असते. समाज प्रबोधन आणि समाजाचे अभिसरण यासाठी मूर्तिपूजा आवश्यक असते. * मूतीर्पूजेबददल समाजात जी मिथ्थ्यक आहेत, जी धारणा आहे, त्याबददल काय वाटते? अमुक एका मंदिरात महिलांना प्रवेश निषिद्ध आहे, असे म्हटले जाते? त्यामागची नक्की सत्यता काय आहे?- मूर्तीबद्दल समाजात खूप मोठे गैरसमज आहेत. ३३ कोटी देव असे म्हटले जाते तेव्हा ते ३३ प्रकारचे देव आहेत. नृत्य गणपतीची मूर्ती बसवली की तो नाचवतो म्हणतात मग ती बसवली तर? तो बसवतो का? असे विचारले तर उत्तर कोणाकडेच नसते. देव भक्तांचं भल करणारा असेल तर तो वाईट करेल का? शास्त्राच्या दृष्टीने या समजाला कोणताही आधार नाही. समाजात ज्या गोष्टी दृढ होतात त्या अपसमजामुळे झालेल्या असतात.  स्वार्थ लोपता हे त्यामागचे कारण आहे. प्राचीन काळात कुठलीच अशी बंधनं नव्हती. ॠग्वेदात विद्वान स्त्रिया पाहातो त्या पुरूष विद्वानांशी वाद घालून जिंकू शकतात मग त्यांनाच प्रवेश नाकारणे हे हास्यास्पद वाटते. * काळानुरूप इतिहासाचे संदर्भ बदलत जातात, त्यामुळे इतिहासाचे पुर्नलेखन होणे आवश्यक आहे का? सध्याची स्थिती काय आहे?- आतापर्यंत जो इतिहास लिहिला तो परक्यांनी लिहिला. ज्या लोकांना राज्य करायचे आहे ते इतिहासांच्या साधनाद्वारे त्यांना अनुकूल होईल अशी घडण ते इतिहासाला देत असतात. आपण इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवतो, त्यामुळे इतर प्रांतापर्यंत आपल्या लोकांचे काम पोहोचत नाही. तिचं साधन असतात केवळ दृष्टीकोन बदलला पाहिजे. भारतीयांच्या दृष्टीकोनातून इतिहास लिहिला गेला पाहिजे.* इतिहासकार त्यांच्या सोयीने इतिहास लिहितात अशी एक टिका केली जाते? त्याबददल काय वाटते?- एखाद्याने इतिहास त्रोटक साधन किंवा दृष्टीकोनातून लिहिला आहे असे जर  कुणाला वाटले तर अन्य साधनांद्वारे तो पूर्ण करता आला पाहिजे. इतिहास लिहिणा-याचा दृष्टीकोन हा तसा म्हटल तर  पक्षपाती असतो. मात्र, देशाला उपयुक्त ठरेल असा सर्वमान्य इतिहास लिहिला गेला पाहिजे. आपल्या काही चुका झाल्या असतील तर त्याही लिहायला हव्यात. इतिहास हा पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा असतो. चुकीच्या गोष्टीही समोर आल्या पाहिजेत. * प्राचीन संस्कृतीमधील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अद्यापही समोर आलेल्या नाहीत? - महाराष्ट्राचा इतिहास ताम्रपाषाण, पुराश्म आणि नवाश्मयुगापर्यंत पोहोचला आहे. अजूनकाही ठिकाणी उत्खनन झाली तर महाराष्ट्राची संस्कृती किती समृद्ध होती हे समोर येईल. राज्यात कितीतरी मंदिरे आहेत त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे. मला  टागोर नँशनल फेलोशीप मिळाली आहे त्यासाठी हिस्ट्रोरिकल रिलिजिअस कल्टवाईज स्टडी महाराष्ट्र बेस्ड आॅन अनकॉमन युनिक इमेजेस हा विषय अभ्यासासाठी निवडला आहे. प्राचीन काळातील देवळांचा अभ्यास देखील झालेला नाही. तो व्हायला हवा. त्यातून ज्या उणिवा राहिल्या आहेत त्या दूर होतील. ------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेhistoryइतिहास