शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

अजित पवारांना धरणांकडे फिरकु देऊ नका  : उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 20:51 IST

‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला.

ठळक मुद्देबैलगाडा शर्यत सुरू करण्याचा विश्वास कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतक-यांना फसविले

खेड/राजगुरूनगर: सध्या राष्ट्रवादी पक्षाची भीती वाटते. कारण धरणे सुकू लागली आहेत. त्यामुळे धरणाच्या आजुबाजुलाही अजित पवारांना फिरकू देऊ नका अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्याचवेळी न्यायासाठी माझी भूमिका असून ती सरकार विरोधात असली तरी मला त्याची फिकीर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.      राजगुरूनगर येथे सोमवारी शेतकरी मेळावा तसेच क्रांतिकारकांच्या स्मारक अनावरण व हुतात्मा राजगुरू पुलाच्या उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.    याप्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,  आमदार निलम गो-हे, सुरेश गोरे व गौतम चाबुकस्वार, संपर्क नेते रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे ,माजी सभापती रामदास ठाकूर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.     उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. या दुष्काळात गाजराची शेती मात्र बहरली आहे. सरकार शेतक-यांना फसवत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळ त्यांना दिसत नाही.त्यांचा योजना आणि थापांचा पाऊस त्यांचा सुरू आहे. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला त्यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. संपूर्ण कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी असताना कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतक-यांना फसविण्यात आले.  भगव्याचे राज्य येणारच असा विश्वास व्यक्त करून बैलगाडा शर्यत सुरू करणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, खेडमध्ये राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना आहेत. मात्र कोणीही यथोचित स्मारक उभारले नाही. १९७८ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पूर्वीच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्यावेळेस त्यांनी तीनही शहीदांचे पुतळे उभारण्याची सूचना केली होती. आज चाळीस वर्षांनी ते पूर्णत्वास आले आहे. डॉ आंबेडकरांचेही भव्य स्मारक उभारण्याची मागणी  आहे. आगामी काळात हे स्मारक उभारले जाईल.        यावेळी आढळराव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. खेड तालुका हा सर्वात आवडीचा मतदारसंघ असल्याने येथे जास्तीस जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येथील दिलावरखान स्मारक आतापर्यंत सर्वांकडून दुर्लक्षित राहिले. मात्र, आपण केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करून त्यास ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी अथक पाठपुरावा करून केदारेश्वर पूल बांधला आहे. बनकरफाटा ते राजगुरुनगर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार आहे. बैलगाडा शर्यतीत अडथळे आणणा-या पेटा संघटनेला धडा शिकवणार आहे.     यावेळी आमदार सुरेश गोरे यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. आभार जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर यांनी मानले.......................

टॅग्स :KhedखेडUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDamधरणShiv Senaशिवसेना