शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

अजित पवारांना धरणांकडे फिरकु देऊ नका  : उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 20:51 IST

‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला.

ठळक मुद्देबैलगाडा शर्यत सुरू करण्याचा विश्वास कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतक-यांना फसविले

खेड/राजगुरूनगर: सध्या राष्ट्रवादी पक्षाची भीती वाटते. कारण धरणे सुकू लागली आहेत. त्यामुळे धरणाच्या आजुबाजुलाही अजित पवारांना फिरकू देऊ नका अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्याचवेळी न्यायासाठी माझी भूमिका असून ती सरकार विरोधात असली तरी मला त्याची फिकीर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.      राजगुरूनगर येथे सोमवारी शेतकरी मेळावा तसेच क्रांतिकारकांच्या स्मारक अनावरण व हुतात्मा राजगुरू पुलाच्या उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.    याप्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,  आमदार निलम गो-हे, सुरेश गोरे व गौतम चाबुकस्वार, संपर्क नेते रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे ,माजी सभापती रामदास ठाकूर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.     उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. या दुष्काळात गाजराची शेती मात्र बहरली आहे. सरकार शेतक-यांना फसवत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळ त्यांना दिसत नाही.त्यांचा योजना आणि थापांचा पाऊस त्यांचा सुरू आहे. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला त्यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. संपूर्ण कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी असताना कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतक-यांना फसविण्यात आले.  भगव्याचे राज्य येणारच असा विश्वास व्यक्त करून बैलगाडा शर्यत सुरू करणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, खेडमध्ये राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना आहेत. मात्र कोणीही यथोचित स्मारक उभारले नाही. १९७८ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पूर्वीच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्यावेळेस त्यांनी तीनही शहीदांचे पुतळे उभारण्याची सूचना केली होती. आज चाळीस वर्षांनी ते पूर्णत्वास आले आहे. डॉ आंबेडकरांचेही भव्य स्मारक उभारण्याची मागणी  आहे. आगामी काळात हे स्मारक उभारले जाईल.        यावेळी आढळराव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. खेड तालुका हा सर्वात आवडीचा मतदारसंघ असल्याने येथे जास्तीस जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येथील दिलावरखान स्मारक आतापर्यंत सर्वांकडून दुर्लक्षित राहिले. मात्र, आपण केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करून त्यास ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी अथक पाठपुरावा करून केदारेश्वर पूल बांधला आहे. बनकरफाटा ते राजगुरुनगर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार आहे. बैलगाडा शर्यतीत अडथळे आणणा-या पेटा संघटनेला धडा शिकवणार आहे.     यावेळी आमदार सुरेश गोरे यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. आभार जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर यांनी मानले.......................

टॅग्स :KhedखेडUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDamधरणShiv Senaशिवसेना